Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री राम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

श्री राम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला

Surajya Digital
Last updated: 2020/07/19 at 2:01 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन पार पडणार असून, याची तारीखही ठरली आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

राम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का?, असा सवाल शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना केला आहे. सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोरोना विषाणू फैलावाच्या परिस्थिती सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पवार सोलापुरात आले होते. आढावा बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी कोरोना संकटाच्या मुद्यावरून मोदी सरकारला चिमटे काढले. अयोध्येतील बहुप्रतिक्षित राम मंदिराच्या निर्माणाला ५ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या मंदिराच्या भूमिपूजनासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याचे सांगितले जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. सध्या कोरोना नष्ट व्हावा, अशी सर्वांची इच्छा आहे. त्याला प्राधान्य दिले पाहिजे. मात्र काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल, अशी टीका शरद पवार यांनी सोलापूर येथील पत्रकार परिषदेत केली आहे.

शरद पवार म्हणाले की, “कोरोनाचे संकट सध्या संपूर्ण विश्वात पसरले आहे. संकटात अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोनापेक्षाही राम मंदिराचा मुद्दा अधिक महत्त्वाचा वाटत असेल, मला माहित नाही, असे टोला पवारांनी लगावला.

कदाचित मंदिर बांधल्याने कोरोना निघून जाईल, म्हणून ते राम मंदिराचे भूमिपूजन करत असतील, मला माहित नाही, असा टोला पवारांनी लगावला.

सोलापूरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे हे सोलापूर येथे आले होते. ग्रामीण महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये सोलापूरचा समावेश होत असून ही चांगली बाब नसल्याचेही पवारांनी यावेळी सांगितले.

“कोरोनाचे संकट सध्या संपूर्ण विश्वात पसरले आहे. संकटात अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोरोनापेक्षाही राम मंदिराचा मुद्दा अधिक महत्त्वाचा वाटत असेल, मला माहित नाही”
– शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष

 

You Might Also Like

सोलापूर विद्यापीठ : नापास विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात प्रवेश

सोलापुरातील १३४८ सदनिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

सोलापूर जिल्हा परिषदेच्या कृषी औजार लॉटरीचा कार्यक्रम संपन्न

सोलापूर जिल्ह्यातील ३२ हजार शेतकऱ्यांना ४० कोटींची भरपाई

सोलापूरातील नवीपेठ दवाखाना सील; अनधिकृत गर्भलिंग चाचणीचा संशय

TAGGED: #राममंदिर #कोरोनाप्राधान्य #शरदपवार #पंतप्रधानांना #टोला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर : श्री राम मंदिर कार्यक्रमांविषयी शरद पवारांचे मत
Next Article तुळजापूर घाटात एस वळणावर ट्रक झाला पलटी; दुचाकीस्वार ठार तर एक जखमी, ट्रकचालक फरार

Latest News

सोलापूर विद्यापीठ : नापास विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात प्रवेश
सोलापूर August 16, 2025
सोलापुरातील १३४८ सदनिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
सोलापूर August 16, 2025
चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी भारत दौऱ्यावर; सीमा वादावर होणार द्विपक्षीय चर्चा
देश - विदेश August 16, 2025
रशियाच्या सैनिकी कारखान्यात भीषण स्फोट; ११ ठार, १३० जखमी
देश - विदेश August 16, 2025
मुंबई महापालिकेत भाजपाचाच झेंडा फडकणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र August 16, 2025
पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला प्रकरणात तीन आरोपी अटकेत
महाराष्ट्र August 16, 2025
बीसीसीआय करणार देशांतर्गत क्रिकेट नियमांमध्ये बदल – गंभीर दुखापतीत बदली खेळाडूला संधी
देश - विदेश August 16, 2025
दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांचा भारतीय सैन्याला सलाम – मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्र August 16, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?