Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 10, 12 वीच्या परीक्षेसाठी केंद्रे वाढणार, मात्र तीन किमी अंतरावरच असणार परीक्षा केंद्र
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

10, 12 वीच्या परीक्षेसाठी केंद्रे वाढणार, मात्र तीन किमी अंतरावरच असणार परीक्षा केंद्र

Surajya Digital
Last updated: 2021/02/08 at 10:14 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : कोरोनाची स्थिती सावरत असतानाच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. आता कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्याने शाळाही सुरू झाल्या आहेत. त्यातच आता, कोरोनाची संभाव्य स्थिती विचारात घेऊन परीक्षांचे नियोजनही केले जात आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे.

दरवर्षीप्रमाणे परीक्षा घेण्यास काही हरकत नाही, असे पुणे बोर्डाचे मत आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेचे अर्ज भरून घेण्यात आले असून, दोन्ही वर्गातील सुमारे 32 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. मात्र, राज्यातील कोरोना अद्याप संपला नसल्याने एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वीप्रमाणे ठरलेल्या केंद्रांवर घेणे अशक्‍य मानले जात आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रे वाढतील, असा अंदाज आहे. तीन किलोमीटरच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्रे असणार आहेत.

* 25 टक्‍के अभ्यासक्रम वगळून प्रश्‍नपत्रिका

परीक्षांचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिले जाईल, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, परीक्षा केंद्रे वाढणार की नाहीत, पूर्वीच्याच परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे, याबद्दल या विभागाने काहीच घोषणा केलेली नाही. मात्र शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार 25 टक्‍के अभ्यासक्रम वगळून प्रश्‍नपत्रिका तयार केल्या जाणार आहेत. परीक्षेसह अन्य अडचणींसंदर्भात विद्यार्थी व पालकांचे समुपदेशन तथा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशकांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून कोरोनाची भीती दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; लातूरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
Next Article इशांतने गाठला 300 बळींचा टप्पा, अश्वीनने मोडला अनेक दशकांपूर्वीचा विक्रम

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?