Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बार्शीत 17 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, दोन दिवस भरगच्च कार्यक्रम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

बार्शीत 17 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, दोन दिवस भरगच्च कार्यक्रम

Surajya Digital
Last updated: 2021/02/11 at 9:56 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

सोलापूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे व कवी फुलचंद नागटिळक प्रतिष्ठान खैराव यांच्या संयुक्त विद्यमाने 13 व 14 फेब्रुवारी रोजी बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे 17 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या संमेलन स्थळाला डॉक्‍टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार राजा माने हे आहेत. तर उद्‌घाटन 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शरद गोरे हे उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाचे निमंत्रक शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, स्वागताध्यक्ष आमदार राजेंद्र राऊत, सहस्वागताध्यक्ष शोभा घुटे पाटील, कार्याध्यक्ष नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, आयोजक फुलचंद नागटिळक, कार्यवाहक महारुद्र जाधव हे आहेत.

या संमेलनाचा प्रारंभ 13 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता भगवंत मंदिर येथून ग्रंथदिंडीने होणार आहे. ग्रंथदिंडीचे उद्‌घान ह.भ.प. डॉ.अनंत बिडवे महाराज, ग्रंथपूजन ह.भ.प. विलास जगदाळे यांच्या हस्ते होणार आहे.

साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन दुपारी चार वाजता राहुल जगदाळे निर्मित डॉक्‍टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे या लघुपट प्रदर्शनाने होणार आहे. श्रीपाद सबनीस यांच्या हस्ते होणार असून राजा माने अध्यक्षस्थानी आहे. स्वागताध्यक्ष आमदार राजेंद्र राऊत, निमंत्रक बी वाय यादव, कार्याध्यक्ष असिफभाई तांबोळी, शरद गोरे, खासदार ओमराजे निंबाळकर, डॉ. प्रकाश बुरगुटे, धनाजी साठे, संतोष ठोंबरे, सोमेश्वर घाणेगावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या वेळी ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता कवी फुलचंद नागटिळक यांचा नटसम्राट हा एकपात्री प्रयोग होणार आहे. याचे उद्‌घाटक अमर देवकर हे आहेत. यावेळी लोककला व इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
रविवारी सकाळी 9 वाजता कविसंमेलन होणार आहे. यात संजय बैरागी अध्यक्ष आहेत जुगलकिशोर तिवाडी यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे.

दुपारी अकरा वाजता उद्योजक मनोज कदम यांची प्रकट मुलाखत होणार आहे. मुलाखतकार मुंबई आकाशवाणीचे निवृत्त कार्यक्रम अधिकारी महादेव जगदाळे हे आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून राजे लखुजी जाधव यांचे 16 वे वंशज राजे अमरसिंह जाधव, राजेंद्र मिरगणे, सुभाष शेवाळे, दादासाहेब साठे, अमोल विष्णू गरड, बापूसाहेब कदम उपस्थित राहणार आहेत.

रविवारी दुपारी 12 वाजता अनिल गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. दुपारी दोन वाजता कृषी साहित्य व शेतकऱ्याचे प्रदर्शन या विषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाचे अध्यक्ष कॉ. तानाजी ठोंबरे आहेत. दुपारी तीन वाजता प्रकाश गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली बार्शीकरांचे कविसंमेलन होणार आहे. सायंकाळी साडेचार वाजता पुरस्कार वितरण व समारोप सोहळा डॉ. श्रीकांत मोरे, माजी मंत्री दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे आमदार, तानाजी सावंत, अभिजित धराशिवकर हे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी डॉ. व. न. इंगळे, डॉ. चंद्रकांत मोरे, डॉ. भारती रेवडकर, डॉ. राजेंद्र दास, मुकुंदराज कुलकर्णी, शब्बीर मुलानी, पां.न. निपाणीकर, रामचंद्र इकारे या बार्शीकरासमवेत सीमा भागातील साहित्यिक डॉ. गोपाल महामुनी, ज्येष्ठ साहित्यिक अजित सगळे, ज्येष्ठ साहित्यिक चारुदत्त कासार यांचा सन्मान होणार आहे. तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या मंगल बांगर, माधुरी सुनिता उकिरडे, मातृभूमी प्रतिष्ठान, राजमाता इंदुमती आंदळकर अन्नछत्रालय, संभाजी घाडगे, शेळके, उमेश काळे, इंगळे यांचा गौरव होणार आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #17th #Grameen #Marathi #Sahitya #Sammelan #inBarshi, #बार्शीत #17व्याग्रामीण #मराठीसाहित्यसंमेलन #दोनदिवस #भरगच्च #कार्यक्रम
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणाऱ्याला लग्न करावेच लागणार’
Next Article बिर्याणी, खिचडी आणि लोणचं हे पदार्थ जाणार अंतराळात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?