मुंबई : खासगी क्षेत्रातील यस बँकेने मुंबईतील अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (ADAG)चे मुख्य कार्यालय, रिलायन्स सेंटर स्वत:च्या ताब्यात घेतले आहे. एका जाहिरातीत बँकेने सांगितले की, मुंबईतील सांताक्रूज येथील २१ हजार वर्ग फूटपेक्षा अधिक जागा असलेले मुख्यालय आणि दक्षिण मुंबईतील नागिन महल या दोन मजली इमारतीचा ताबा येस बँकेने घेतला आहे.
रिलायन्स भवनचा ताबा २२ जुलै रोजी SARFESI या कायद्यानुसार घेतला आहे. अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपला २ हजार ८९२ कोटीचे कर्ज फेडण्यात अपयश आले. या वर्षी मार्च महिन्यात इडीच्या चौकशीत अनिल अंबानी यांनी सांगितले होते की यस बँकेकडून त्यांनी घेतलेले कर्ज सुरक्षित आहे. बँकेकडून घेतलेले हे कर्ज कोणत्याही परिस्थितीत परत करणार असून भलेही त्यासाठी संपत्ती विकावी लागली तरी चालेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अनिल अंबानी यांच्या मुख्यालयाचा येस बँकेने ताबा घेतला. हेच अंबानी २००८ साली जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले होते. अनिल अंबानी यांना टेलिकॉम, पॉवर आणि मनोरंजन क्षेत्रात झालेल्या मोठ्या तोट्यामुळे त्यांच्यावरील कर्ज वाढत गेले. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ब्रिटनमधील कर्जा खटल्याच्या सुनावणी दरम्यान अनिल अंबानी यांनी स्वत:ची संपत्ती शून्य सांगितली होती.
या चौकशीत अनिल अंबानी यांनी बँकेचे माजी संचालक राणा कपूर, पत्नी आणि मुलगी अथवा यांच्या नियंत्रणात असलेल्या कंपनीशी कोणताही संबंध नाही. मे महिन्यात इडीने राणा कपूर त्यांच्या मुली रोशनी, राधा आणि राखी कपूर यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. सध्या बँकेचा दारभार प्रशांत कुमार हे सांभाळत आहेत.