Surajya Digital

मराठा आरक्षणासाठी राज्यातील प्रत्येक गावात बुधवारी उपोषणाला बसण्याचे आवाहन, सोलापुरातही झाली बैठक

मराठा आरक्षणासाठी राज्यातील प्रत्येक गावात बुधवारी उपोषणाला बसण्याचे आवाहन, सोलापुरातही झाली बैठक

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यशासन वेळकाढूपणा करीत आहे. यामुळे मराठा समाजाने आता पुन्हा एकजूट दाखवून शासनावर दबाव निर्माण करण्याची गरज आहे. त्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. यासाठी राज्यातील प्रत्येक गावात 10 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसण्याचे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सोलापुरात केले.

मराठा आरक्षणासाठी होत असलेली चालढकल यामुळे आंदोलनाची पुढील दिशा काय असावी? यासाठी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे काल रविवारी मराठा समाजाची बैठक झाली. यावेळी माऊली पवार, राम गायकवाड, नगरसेवक अमोल शिंदे, किरण पवार, दास शेळके, आनंद जाधव, प्रताप कांचन आदी उपस्थित होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यशासन वेळकाढूपणा करीत आहे. तसेच ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण करून सत्ता टिकविण्याचा प्रयत्न शासन करीत असल्याचा आरोप केला. पाटील म्हणाले, विद्यमान सरकार सध्या मराठा समाजाकडे दुर्लक्ष करीत आहे, तर यामध्ये मराठ्यांचा पक्ष म्हणूनही काही पक्ष सामील आहेत. त्यांनीही आता समाजाकडे लक्ष द्यावे, असा अप्रत्यक्ष टोला नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीला लगावला.

विद्यमान सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बरखास्त करून समाजावर अन्याय केला आहे. तसेच त्यासाठी एक रुपयाचीही आर्थिक तरतूद केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. सारथी संस्था ही बंद पाडण्याच्या विचारात सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे शासनाला मराठा समाजाची ताकद पुन्हा एकदा दाखविण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात उपोषण करण्यासाठी मराठा समाजाने सज्ज रहावे, असे आवाहन पाटील यांनी केले.

Related Articles