मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात लॉकडाऊन होणार का, असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रकार परिषदेत करण्यात आला. तेव्हा त्यांनी लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही, असं म्हटलं. तसेच दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि लॉकडाऊन टाळा, असंही ते म्हणाले. जे मास्क लावत नाहीत त्यांना माझा नमस्कार, असं म्हणत त्यांनी मास्क न वापरणाऱ्यांवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिला, असं ते म्हणाले. तसेच संजय राठोड प्रकरणात गलिच्छ राजकारण केलं जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
घटना घडल्याची माहिती समजल्यापासून पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत, असंही ते म्हणाले. पूजा प्रकरणातील दोषींना सोडणार नाही, असंही ते म्हणाले.
‘कशात काही नाही आणि आरोप करत सुटायचे, असले राजकारण सुरू आहे. खायाला आम्ही आणि द्यायला कमी, असे केंद्रातील सरकार आहे. वीज बिलांबाबत आंदोलने करत आहेत. मग इंधन दरवाढीबद्दल महाराष्ट्रातील विरोधक गप्प का? आजवर विराट कोहलीसह अनेकांची सेंच्युरी पाहिली. पण इंधन दरवाढीची सेंच्युरी प्रथमच पाहतोय’, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलताना म्हटले.