नाशिक : सटाणा तालुक्यात शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक झाला आहे. अवकाळी पाऊस आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीने शेतकरी त्रस्त आहेत. त्यात आता शेतकऱ्यांवर वीज बील भरण्यासाठी सक्ती करण्यात येत असून वीज कनेक्शन तोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी चक्क भाजप आमदारालाच ग्रामपंचायत कार्यालयात कोंडल्याचे समोर आले आहे.
महावितरणाकडून अन्यायकारक बिलं दिल्यानंतर, सक्तीची वसूली महावितरणाकडून होत आहे, याविरोधात आज शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला, यावेळी शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करायला आलेल्या आमदारालाच ग्राम पंचायतीत कोडलं. सटाणा तालुक्यातील केरसाणे गावच्या गावकऱ्यांनी आमदाराला ग्रामपंचायतीत कोडलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
राज्यभरात महावितरणाच्या बिलांवर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे, महावितरणाची ही बिलं म्हणजे खोटंवितरण असल्याची टीका या बिलांवर होत आहे. आमदार दिलीप मंगळू बोरसे हे अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी गेले होते, तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांना कार्यालयात बसवलं आणि त्यांच्यासोबत आत काही गावकरी देखील आहेत, तर काहींनी दार लावून ते ग्रामपंचायत कार्यालयसमोर बसले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अवकाळी पावसाचा वरून मार पडतोय, एकीकडे कोरोनाच्या काळात पिकांना कोणताही भाव मिळाला नाही, आणि सरकारकडून अव्वाच्या सव्वा बिलं दाखवून, सुल्तानी वसुली केली जात आहे. तसेच वीज कंपनीने जे कनेक्शन तोडले आहेत, ते ताबडतोब जोडा अन्यथा आमदारसाहेबांना कार्यालयाबाहेर सोडणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला, यानंतर आमदार दिलीप बोरसे यांची तासाभरात गावकऱ्यांनी सुटका केली आहे.
* अव्वाच्या सव्वा वीजबील
अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी गेले असताना आमदार बोरसे यांना शेतकऱ्यांनी कार्यालयात बसवलं आणि त्यांच्यासोबत आत काही गावकरी ठेवले. तर उर्वरित शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीचं दार बंद करून कार्यालयसमोर ठिय्या दिला.
यंदा मालाला भाव मिळाला नसून अव्वाच्या सव्वा वीजबील दाखवून वसुली करण्यात येत आहे. महावितरणने तोडलेले वीज कनेक्शन ताबडतोब जोडून द्यावे, अन्यथा आमदार बोरसेंना सोडणार नसल्याचा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. मात्र एक तासानंतर शेतकऱ्यांनी बोरसे यांची सुटका केली.