लीड्स : लीड्स कसोटीत भारताचा आज दारुण पराभव झाला आहे. इंग्लंडने भारतावर एक डाव आणि 76 धावांनी विजय मिळवला आहे. भारताचा दुसरा डाव आज 278 धावांवर संपला. भारताकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 91 धावा केल्या. तर विराटने 55 धावा केल्या. पहिल्या डावात भारताने फक्त 78 धावा केल्या होत्या. तर इंग्लंडने 432 धावा केल्या होत्या. मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आली आहे.
तिसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात भारताला 78 धावांमध्ये ऑल आऊट केल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी सुरुवातीला चांगली फलंदाजी करत तिसरा दिवस आपल्या नावे केला.
मात्र चौथ्या दिवशी टीम इंडियाची पुन्हा एकदा घसरगुंडी पाहायला मिळाली. कालच्या 2 बाद 215 वरुन पुढे खेळणाऱ्या टीम इंडियाने आज एका सत्रात उर्वरित 8 विकेट्स गमावल्या. अखेर भारताचा डाव 278 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने या सामन्यात भारतावर एक डाव आणि 76 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रोहित शर्मा ( 59) व चेतेश्वर पुजारा यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून भारताच्या धावसंख्येत भर घातली. रोहित व चेतश्वर पुजारा या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली चौथ्या दिवसाच पुजारा व कोहली दोघंही सावध पवित्र्यातच दिसले, परंतु ऑली रॉबिन्सनचा आता येणारा चेंडू सोडण्याचा पुजाराचा डाव फसला. मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद दिले, परंतु कर्णधार जो रूटनं विलंब न करता लगेच DRS घेतला. लिड्सच्या मोठ्या स्क्रीनवर जेव्हा चेंडू स्टम्प्सवर आदळताता पाहताच इंग्लंडच्या खेळाडूंनी मोठा जल्लोष केला. पुजाराला चौथ्या दिवसाच्या खेळात एकही धाव करता आली नाही. 189 चेंडूंत 15 चौकारांसह तो 91 धावांवर माघारी परतला. कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदीर होती.
कोहलीनं अर्धशतक पूर्ण केले, पण रॉबिन्सन यानं त्यालाही चालतं केलं. कोहली 125 चेंडूंत 55 धावांवर गेला. त्यानंतर जेम्स अँडरसननं टीम इंडियाला मोठा धक्का देताना रहाणेला ( 10) बाद केलं. रॉबिन्सनची गाडी सुसाट सुटली अन् रिषभ पंतला ( 1) बाद करून त्यानं विकेट्सचा चौकार खेचला. भारतानं 24 धावांत चार फलंदाज गमावले. रूटनं गोलंदाजीत बदल करताना चेंडू मोईन अलीच्या हाती सोपवला अन् त्याचा हा डाव यशस्वी ठरला. अलीनं मोहम्मद शमीचा ( 6) त्रिफळा उडवून टीम इंडियाचा पाय आणखी खोलात टाकला. रॉबिन्सननं डावातील पाचवी विकेट घेताना इशांत शर्माला ( 2) झेलबाद केले. कसोटी क्रिकेटमधील त्यानं दुसऱ्यांदा पाच विकेट्स घेतल्या.