ठाणे : ठाण्याच्या कल्याण -नगर महामार्गावर एक भीषण अपघात झाला. या अपघातात उल्हासनगर महापालिकेतील एका तरुण नगरसेवकाचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अजित उर्फ पप्पू प्रभुनाथ गुप्ता असं या मृत नगरसेवकाचं नाव आहे. गुप्ता यांच्या कारला दुसऱ्या एका वाहनानं जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
या घटनेने पप्पू गुप्ता यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शहरात या घटनेचा शोक व्यक्त केला जात आहे. या अपघातात त्यांच्यासोबत अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर उल्हासनगर मधील क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री पप्पू गुप्ता हे आपल्या मित्रांसोबत टिटवाळा येथे जात असताना, पाचवा मैल भागात हा अपघात घडला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नगरसेवक गुप्ता यांच्या निधनाचे वृत्त शहरात पसरताच अनेकांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात गर्दी केली होती. गुप्ता हे महापालिकेतील तरुण नगरसेवक होते. या घटनेने पप्पू गुप्ता यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शहरात या घटनेने शोक व्यक्त केला जात आहे.
रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनंतर रुग्णालयात अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मृत अजित उर्फ पप्पू गुप्ता हे उल्हासनगर महापालिकेतील नगरसेवक आणि पाणी पुरवठा सभापती होते. कल्याण-नगर महामार्गावर रात्री उशिरा झालेल्या कार अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.