Tuesday, May 30, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

भाजप खासदाराची मागणी; कृषी आंदोलनातील शहीद शेतक-यांना द्या एक कोटीची मदत

Surajya Digital by Surajya Digital
November 21, 2021
in Hot News, देश - विदेश, राजकारण
0
भाजप खासदाराची मागणी; कृषी आंदोलनातील शहीद शेतक-यांना द्या एक कोटीची मदत
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : भाजप खासदार वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. तसेच कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणारे 700 शेतकरी शहीद झाले आहेत, जर कृषी कायदे आधीच मागे घेतले असते, तर निष्पापांचा जीव वाचला असता, असे गांधी यांनी म्हटले. आता या आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी 1 कोटी रुपये देण्यात यावे, अशीही मागणी वरुण गांधी यांनी केली.

या पत्रात वरुण गांधी म्हणाले, या पत्रात वरुण गांधी यांनी मी तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेचे स्वागत करतो. शेतकरी बांधव आंदोलन संपवून सन्मानाने घरी परतावेत. माझी नम्र विनंती आहे की, एमएसपी व इतर मुद्द्यांवर कायदा करण्याच्या मागणीवरही त्वरित निर्णय घेण्यात यावा.

या पत्रात त्यांनी लखीमपूर खेरीची घटना लोकशाहीला लागलेला कलंक आहे. या प्रकरणाशी संबंधित मंत्र्यांवर कठोर कारवाई करावी. त्याचबरोबर देशहिताच्या दृष्टीने हमीभावाचा कायदा करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तसंच या आंदोलनात 700 शेतकरी शहीद झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रत्येकी 1 कोटींची भरपाई द्यावी. अशी मागणी या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

भाजप खासदार वरुण गांधी यांनी केवळ शेतकरी आंदोलनच नव्हे तर लखीमपूर खिरी येथील घटनेवरूनही आपल्याच पक्षाच्या सरकारला घेरले. लखीमपूरमध्ये 5 शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. ही घटना लोकशाहीवर काळा डाग आहे. या प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा वरुण गांधी यांनी केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

उच्च पदस्थ नेत्यांनी सुद्धा कृषी कायद्यांच्या विरोधात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर उलट-सुलट प्रतिक्रिया दिल्या. त्याच उपेक्षेतून लखीमपूर खिरी सारख्या घटना घडल्या. लखीमपूरमध्ये ऑक्टोबर महिन्यात पाच शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. ही घटना लोकशाहीवर एक काळा डाग आहे. त्या प्रकरणाची सुद्धा निःपक्ष चौकशी व्यायला हवी. यामध्ये सहभागी असलेल्या केंद्रीय मंत्र्यावर सुद्धा कठोर कारवाई करायला हवी. सरकार लवकरच या मुद्द्यांवर ठोस निर्णय घेईल अशी अपेक्षा करतो असेही वरुण गांधी यांनी आपल्या पत्रातून लिहिले आहे.

* भाजपला रामराम ?

भाजप खासदार वरुण गांधी सध्या स्वपक्षाला खडे बोल सुनावत असल्यानं चांगलेच चर्चेत आहे. तीन कृषी कायदे, लखीमपूर खेरी येथील घटना आणि कंगना रणौत च्या ‘भीक मे मिली आझादी’ या वक्तव्यावर वरुण गांधी यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे.

त्यामुळं ते भाजपला राम राम करणार असल्याची शक्यता आहे. मात्र, वरुण गांधी भाजपला राम राम करुन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार की ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल  काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ममता बॅनर्जी सध्या तृणमूल काँग्रेसच्या राजकीय विस्तारात व्यस्त आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी काँग्रेसच्या अनेक बडे नेत्यांना पक्षात स्थान दिलं आहे. त्यामुळे आता त्या वरुण गांधींना आपल्या पक्षात घेणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Tags: #Give #crore #families #farmers #martyred #agitation#आंदोलन #शहीद #शेतकरी #कुटुंबिय #1कोटी #मदत
Previous Post

26 देशांची भ्रमंती करणाऱ्या चहावाल्या आजोबांचं निधन, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही व्यक्त दुःख

Next Post

आंध्रामध्ये मुसळधार पाऊस- 28 मृत्यू, 15 हजार लोक बेघर

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
आंध्रामध्ये मुसळधार पाऊस- 28 मृत्यू, 15 हजार लोक बेघर

आंध्रामध्ये मुसळधार पाऊस- 28 मृत्यू, 15 हजार लोक बेघर

वार्ता संग्रह

November 2021
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Oct   Dec »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697