नवी दिल्ली : देशभरात 2020 मध्ये 5579 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 2567 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अनेक कारणं यामागे आहेत.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही माहिती संसदेत दिली. तर कर्नाटकमध्ये 1,072 आणि आंध्र प्रदेशमध्ये 564 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. प्रशासनाचा नाकर्तेपणा हा शेतकऱ्याच्या आत्महत्येमागील सर्वात मोठं कारण असल्याचेही म्हटलं आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या अहवालानुसार 2020 मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये 18% वाढ झाली आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट होत आहे.
2019 च्या तुलनेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येत घट झाली असली तरी हा आकडा लहान नाही. 2019 मध्ये देशात 5957 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) आकडेवारीचा हवाला देत तोमर यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यामागचे वेगळे कारण एनसीआरबीने अहवालात दिलं नाही. पण कौटुंबीक समस्या, आजारपण, अमली पदार्थांचा गैरवापर, व्यसन, प्रेम प्रकरणं, विवाहसंबधित मुद्दे, बेरोजगारी, व्यावसायिक समस्या, परीक्षेतील अपयश, संपत्तीचा वाद अशा विविध कारणातून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं एनसीआरबीने आपल्या अहवालात म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* मराठवाडा विभाग शेतकऱ्यांसाठी ‘सुसाईड झोन’
महाराष्ट्रातील मराठवाडा हा विभाग शेतकऱ्यांसाठी ‘सुसाईड झोन’ म्हणूनच ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षात या भागातील अनेक शेतकरी कुटुंबीयांची संसारं उद्धवस्त झाली आहेत.
येथील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळ आणि ओला दुष्काळाचा जबरदस्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या विभागातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
2020 मध्ये महाराष्ट्रात एकूण 2567 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आकडा देशातील एकूण शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या तुलनेत तब्बल 43 इतका आहे.
* आत्महत्येची आकडेवारी
देशातील आत्महत्या करणारे जवळपास आर्धे शेतकरी महाराष्ट्रातील आहेत. त्यापाठोपाठ, कर्नाटक (1072), आंध्र प्रदेश (564), तेलंगणा (466), मध्य प्रदेश (235), आणि चंदीगडमध्ये 227 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर उत्तर प्रदेशात 2020 मध्ये 87 शेतकऱ्यांनी आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. त्यानंतर, तामिळनाडू (79), केरळ (57), आसाम (12), हिमाचल प्रदेशमध्ये 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या व्यतिरिक्त मेघालय आणि मिझोराम या ईशान्यकडील राज्यात प्रत्येक चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.
मागील सलग चार वर्षे झालेल्या घटनंतर कृषी क्षेत्रातील आत्महत्यांच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. 2016 मध्ये एकूण 11379 शेतकरी आणि शेतमजूरांनी आत्महत्या केली. 2017 मध्ये ती 10655 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. यावर्षी हे प्रमाण घटले होते. 2018 मध्ये 10349 आणि 2019 मध्ये अशा एकूण 10281आत्महत्या झाल्या. 2020 मध्ये आत्महत्या प्रकरणांची संख्या 10677 एवढी होती. जी 2017 च्या तुलनेत वाढलेली आहे. पंजाबमध्ये अशा एकूण 257 आणि हरियाणात 280 आत्महत्यांचे गुन्हे दाखल करण्यात आले.
पश्चिम बंगाल, बिहार, नागालँड, त्रिपुरा, उत्तराखंड, चंदीगड, दिल्ली, लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी येथे शून्य आत्महत्येचे अहवाल आले. विशेष म्हणजे ही आकडेवारी शेतकरी आणि शेतमजूर अशी विभागली गेली आहे. येथे शेतकरी स्वत:ची जमीन असलेले आहेत आणि ते त्याची लागवड करतात, तर शेतमजूर म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही आणि त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत इतरांच्या शेतात काम करून मिळवतात.