बार्शी : सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाची केंद्रिय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्यासमवेत दिल्ली येथे कृषीभवनात बैठक झाली. या बैठकीत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे व प्रदेश सरचिटणीस ऍड. विकास जाधव यांच्या नेतृत्वाखाली कृषीमंत्र्यांसमोर ग्रामस्तरावरील विविध मागण्या मांडण्यात आल्या.
कृषी विभागासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प करण्याच्या प्रमुख मागण्यांसह पीक विमा, कृषी विभागाचे ग्रामविकासातील योगदान, आदींसह विविध मागण्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. परिषदेने दिलेल्या निवेदनाची दखल घेत मंत्री महोदयांनी मागण्यांवर विचार करण्याची ग्वाही दिली.
या निवेदनात, खाजगी विमा कंपन्याऐवजी शासकीय कंपन्याकडून कृषी विम्याचे कामकाज करावे. कृषी विभागाने आजपर्यंत ग्रामीण विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे कृषी विभागाची कामे जलसंधारण विभागाकडे देण्यात येऊ नयेत. ग्रामपंचायतीचे नामकरण ग्रामकृषी पंचायत करुन कृषी सहाय्यकाला ग्रामस्तरावर कार्यालय देण्यात यावे. कृषी विभागातील राज्यस्तरीय अधिकारी कृषी शाखेचे पदवीधर असणे बंधनकारक करावे. रासायनिक ऐवजी सेंद्रिय खतांना प्राधान्य द्यावे. ग्रामस्तरावरील सर्व कर्मचार्यांची ग्रामविकास समिती करावी. आदी मागण्यांचा समावेश होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* सोलापूरचे सरपंच दिल्ली दरबारी
अक्कलकोट : सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली. ही बैठक 40 मिनिटे झाली.
यात प्रामुख्याने पीक विमा ,कृषी विभागाची कामे जलसंधारण विभाग यांच्याकडे देण्यात येऊ नयेत, गावात कृषी विभागाचे स्वतंत्र दप्तर असावे या सह अनेक मागण्यांवर चर्चा झाली मंत्री महोदय यांनी परिषदेच्या कामाचे कौतूक करत विम्यासंदर्भात आपल्या सूचना चांगल्या असून त्याचा विचार करू असे आश्वासन दिले.
यावेळी यावेळी सरपंच परिषदे चे प्रदेश सरचिटणीस ॲड विकास जाधव, प्रदेश विश्वस्त राजीव पोतणीस, आनंद जाधव, प्रसिद्ध प्रमुख बापू जगदाळे, अरुण कापसे, मनिषा यादव, वनिता मधुकर सुरवसे, प्रतिभा थोरवे, शत्रुघ्न धनावडे, पंडित मिरगणे, बाळासाहेब पोतनीस, अंबादास गुजर, चंद्रशेखर साके,शरद सानप, संदीप देशमुख, बाळासाहेब आव्हाड, रघुनाथ घुले, बाबासाहेब गोर्डे, अविनाश पालवे,चंन्द्रकांत सनस, अनिल ढीकले, तानाजी गायकर, सदानंद नवले यांची उपस्थित होती.