मुंबई : ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची सुरक्षा वाढवल्याचे वृत्त आहे. केंद्र सरकारने अग्निहोत्री यांना सीआरपीएफची Y दर्जाची सुरक्षा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. लोकांना तो पसंत येत आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अग्निहोत्री सध्या विविध ठिकाणी भेट देत आहेत.
चित्रपटावरून सोशल मिडीयात होणारी वक्तवे आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांना ही सुरक्षा प्रदान करण्यात आलीय. गेल्या 11 मार्च रोजी रिलीज झालेला ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट 1990 च्या कश्मीर बंडखोरी दरम्यान काश्मिरी हिंदूंच्या निर्गमनावर आधारित आहे. एकीकडं देशभरातून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर, दुसरीकडं अनेकांकडून चित्रपटावर जोरदार टीका देखील केली जात आहे.
सोशल मीडियावर देखील अशाच प्रकारचे दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आलीय. अग्निहोत्रींच्या सुरक्षेसाठी 4 ते 5 सशस्त्र कमांडो तैनात करण्यात आले असून त्यांचा मुक्काम आणि भारतभर प्रवासादरम्यान सीआरपीएफ कडून त्यांचे रक्षण केले जाणार आहे.
बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार करणाऱ्या या चित्रपटाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही काश्मिरी पंडितांचा संघर्ष आणि वेदना दाखवल्याबद्दल चित्रपट आणि चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे कौतुक केले आहे.
जर सूत्रांवर विश्वास ठेवायचा असेल तर, केंद्रीय गुप्तचर संस्थांनी, धमकीचा अंदाज घेत, द काश्मीर फाइल्सचे संचालक विवेक अग्निहोत्री यांना व्हीआयपी सुरक्षा देण्याची शिफारस केली. Vivek Agnihotri, the director of ‘The Kashmir Files’, has Y-grade security
Film director Vivek Agnihotri has been given 'Y' category security with CRPF cover pan India: Government Sources
(File photo) pic.twitter.com/63l1B0BlMz
— ANI (@ANI) March 18, 2022
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
इंटेलिजन्स ब्युरो (IB) च्या शिफारशीनुसार केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी विशिष्ट लोकांच्या सुरक्षेचा आढावा घेते. धोक्याच्या पातळीनुसार, उच्चभ्रू आणि विशेष लोकांना संरक्षणाचे विविध स्तर दिले जातात. देशातील व्हीआयपी सुरक्षा लक्षात घेऊन त्यांना विविध श्रेणींची सुरक्षा दिली जाते. बड्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कोणत्या प्रकारची सुरक्षा द्यायची हे ठरवण्याचा अधिकार सरकारला आहे.
दहशतवाद्यांच्या जाचामुळे जम्मू काश्मीरमधून काश्मीरी पंडितांचे मोठ्या प्रमाणावर पलायन झाले होते. या घटनेवर आधारित सिनेमा ‘द काश्मीर फाइल्स’ विवेक अग्निहोत्री यांनी तयार केला आहे. हा सिनेमा देशभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून राजकारणाने जोर पकडला आहे. ‘इंटेलिजन्स ब्युरो’ने (आयबी) विवेक अग्निहोत्री यांच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल दिला आहे. ही माहिती मिळताच विवेक अग्निहोत्री यांना वाय दर्जाचे संरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. अग्निहोत्री यांना सीआरपीएफकडून देशभर वाय दर्जाचे संरक्षण दिले जाणार आहे.
भारतातील सुरक्षा व्यवस्थेचे विविध श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते. यात एसपीजी सिक्युरिटी, झेड प्लस, झेड, वाय आणि एक्स श्रेणीचा समावेश आहे. वाय श्रेणी ही सुरक्षिततेची तिसरी पातळी आहे. हे संरक्षण कमी जोखमीच्या लोकांना दिले जाते. यामध्ये एकूण ११ सुरक्षा कर्मचारी सहभागी आहेत. ज्यामध्ये दोन पीएसओ (खासगी सुरक्षा रक्षक) आणि एक किंवा दोन कमांडो तैनात असतात. देशातील सर्वाधिक लोकांना वाय श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.