Tuesday, February 7, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

‘विठ्ठल’चा चेअरमन विधानसभेच्या आखाड्यात उतरतोच; विठ्ठल परिवाराला मिळाले आक्रमक नेतृत्व

'Vitthal Sugar Factory Chairman is entering the assembly arena; The Vitthal family got aggressive leadership in Pandharpur

Surajya Digital by Surajya Digital
July 8, 2022
in Hot News, राजकारण, सोलापूर
0
‘विठ्ठल’चा चेअरमन विधानसभेच्या आखाड्यात उतरतोच; विठ्ठल परिवाराला मिळाले आक्रमक नेतृत्व
0
SHARES
60
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ विठ्ठलसह पंढरपूरच्या राजकारणातही परिवर्तन

 

पंढरपूर – उद्योगपती अभिजीत पाटील यांनी वारसदार प्रस्थापितांना जोरदार धक्का देत विठ्ठल कारखान्यावर परिवर्तन घडविले असून यामुळे आता तालुक्याच्या राजकारणात विठ्ठल परिवाराला आक्रमक व कर्तृत्ववान नेतृत्व मिळाले आहे. विजयानंतर पाटील यांनी थेट परिचारक गटाला आव्हानं देत आपला इरादा जाहीर केल्याने आता विठ्ठल परिवाराला आश्‍वासक नेता मिळाल्याचे चित्र होते. ‘Vitthal Sugar Factory Chairman is entering the assembly arena; The Vitthal family got aggressive leadership in Pandharpur

 

□ अभिजित पर्वाची सुरुवात

विठ्ठलचा चेअरमन पुढचा आमदार समजला जातो किंवा तो निवडणुकीच्या आखाड्यात उतरतो, हे आतापर्यंत सिद्ध झाले आहे. आतापर्यंत औदुंबर पाटील, राजाभाऊ पाटील, वसंतराव काळे आणि भारत भालके विठ्ठलचे चेअरमन होते. यातील औदुंबर पाटील आणि भालके हे आमदार झाले आहेत. तर राजाभाऊ पाटील आणि वसंतराव काळे यांनी आमदारकीची निवडणूक लढली आहे. आता अभिजित पाटील कोणत्या आणि कशा परिस्थिती निवडणुकीच्या रिंगणात उतरतात याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.

 

त्यांना अनेकांनी राजकारणात या असा केलेला आग्रह पंढरपूरच्या राजकारणाची समीकरणे बदलू शकतो असं राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे. पंढरपूर वासीयांना राजकारणात एका नवीन चेहऱ्याची प्रतीक्षा होती. ती प्रतिक्षा आता संपल्याचे विठ्ठल कारखान्याच्या निकालानंतर दिसून येत आहे. विठ्ठलवरील विजयाच्या निमित्ताने पंढरपूरच्या राजकारणात अभिजित पर्वाची सुरुवात झाली म्हणण्यास हरकत नाही.

 

□ भगीरथ भालकेंचा जनसंपर्क झाला कमी

पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात पांडुरंग व विठ्ठल परिवारातच सहकार व राजकारणातील संघर्ष होत आला आहे. स्व. भारत भालके यांनी 2009 मध्ये आमदारकी मिळवित 1980 नंतर प्रथमच परिवाराला हा बहुमान मिळवून दिला होता. 2020 पर्यंत ते अकरा वर्षे आमदार होते. त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे कारखान्याचे अध्यक्ष बनले तसेच त्यांनी विधानसभा पोटनिवडणूक लढविली. मात्र ते पराभूत झाले. यानंतर त्यांनी जनसंपर्क कमी केला होता. याच काळात अभिजीत पाटील यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली. ते राज्यात चार साखर कारखाने यशस्वीपणे चालवित असून धाराशिव, नांदेड, नाशिक व सांगोला भागात त्यांचे कारखाने आहेत.

 

□ अभिजित पाटील यांनाच का मतदान का ?

मागील तीन वर्षात दोन हंगाम विठ्ठल कारखाना आर्थिक अरिष्टामुळे बंद राहिला होता. यामुळे सभासदांमध्ये नाराजी होती. पाटील यांनी मागील हंगामात बंद राहिलेल्या विठ्ठल कारखान्याच्या साडेसहा हजार सभासदांचा ऊस सांगोला कारखान्यात गाळला होता. यामुळे सहाजिकच सभासदांमध्ये अभिजीत पाटील यांच्याविषयी स्नेह वाढला होता.

भगीरथ भालके यांचे नॉटरिचेबल राहणे, ऊसबिल थकणं यासह कारखाना बंद व कर्जांचा डोंगर यामुळे सभासदांनी या निवडणुकीत चार कारखाने चालविणार्‍या अभिजीत पाटील यांना मतदान केल्याचे दिसत आहे.

अभिजीत पाटील यांनी भालके- काळे पॅनलबरोबरच युवराज पाटील यांच्या गटाचाही पराभव केल्याने आता ते विठ्ठल परिवारातील नेतृत्व पुढे आले आहेत. त्यांनी आपला इरादा जाहीर करत परिवारातील नेत्यांवर विजयानंतर कोणतीही टीका न करता विरोधक असणार्‍या माजी आमदार प्रशांत परिचारक गटावर टिकेची झोड उठविली आहे. यावरून ते आता राजकारणात जास्त सक्रिय राहणार याचे संकेत मिळत आहेत.

 

□ 21 पैकी 20, निर्विवाद वर्चस्व

 

विठ्ठल कारखान्यावर अभिजीत पाटील यांनी निविर्वाद वर्चस्व  मिळवले. एकवीस पैकी वीस जागा जिंकल्या, शहरात व कारखान्याव भव्य स्वागत पंढरपूर – गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अभिजीत पाटील प्रणित विठ्ठल परिवर्तन आघाडीने एकवीस पैकी 20 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

विजयानंतर पाटील यांची भव्य मिरवणूक समर्थकांनी काढली होती. त्याचे कारखाना कार्यस्थळावरही भोंगा वाजवून स्वागत करण्यात आले. कामगारांनीही जल्लोष केला.  5 जुलै रोजी मतदान झाले होते. तर बुधवारी 6 रोजी मतमोजणीस सुरूवात झाली. जवळपास 24 तास मतमोजणी सुरू होती. गुरूवारी सकाळी अधिकृतपणे निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी विजयी उमेदवारांची घोषणा केली.

या निवडणुकीत प्रथमच उतरलेल्या अभिजीत पाटील यांनी भगीरथ भालके व युवराज पाटील यांच्यासारख्या मातब्बर पॅनलना पराभूत करत एकहाती सत्ता मिळविली आहे. केवळ संस्था मतदारसंघात त्यांचा उमेदवार पराभूत झाला व येथून भालके गटाचे समाधान काळे 64 मतं घेवून विजयी झाले.

बाकी ऊस उत्पादक व अन्य गटात अभिजीत पाटील गटाचे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांचे मतांचे अंंतर हे आठशे ते अठराशे इतके मोठे आहे.

□ गटनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे –

 

तुंगत गट- अभिजीत पाटील प्रवीण कोळेकर , करकंब- दत्तात्रेय नरसाळे, नवनाथ नाईकनवरे, कालिदास साळुंखे ,कासेगाव- सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, प्रेमलता बब्रुवान रोंगे, भाळवणी- साहेबराव नागणे, धनंजय काळे, कालिदास पाटील , मेंढापूर- दिनकर चव्हाण, जनक भोसले ,सरकोली- संभाजी भोसले, सचिन वाघाटे , अनुसूचित जाती मतदारसंघ- सिताराम गवळी इतर मागास वर्ग- अशोक जाधव संस्था मतदारसंघ- समाधान काळे, महिला प्रतिनिधी- कलावती महादेव खटके, सविता विठ्ठल रणदिवे, भटक्या विमुक्त जाती- सिद्धेश्‍वर शंकर बंडगर

 

या निवडणुकीत तीन पॅनल असल्याने मोठी चुरस होती. प्रस्थापित असणार्‍या भालके व काळे तसेच युवराज पाटील व गणेश पाटील या दोन्ही पॅनलना अभिजीत पाटील यांनी डॉ.बी.पी.रोंगे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांना बरोबर घेवून आव्हानं दिले होते.

 

□ विठ्ठल कारखाना या हंगामात होणार सुरू

 

मतदारांनी अभिजित पाटील यांच्यावर विश्‍वास दाखवत कारखाना ताब्यात दिला आहे. दरम्यान विजयानंतर पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण करून तेथेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी कारखाना या हंगामात सुरू केला जाईल, असे सांगत थकीत ऊसबिल देण्याची ग्वाही दिली. तसेच यापुढे तालुक्यात ऊसदराची स्पर्धा होईल असे सांगत परिचारकांच्या पांडुरंग परिवाराला खुले आव्हानं दिले. यानंतर कारखान्यावर ते गेले असता कर्मचार्‍यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. कारखान्याचा भोंगा वाजविण्यात आला. या ठिकाणी त्यांनी कर्मचारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

 

 

Tags: #Vitthal #Sugar #Factory #Chairman #entering #assembly #arena #Vitthalfamily #aggressive #leadership #Pandharpur #AbhijitPatil#विठ्ठल #साखर #कारखाना #चेअरमन #विधानसभा #आखाड्यात #उतरतोच #विठ्ठलपरिवार #आक्रमक #नेतृत्व #पंढरपूर
Previous Post

नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट संतांच्या पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश

Next Post

शिवसेनेचा निवडणूक चिन्ह टिकवण्यासाठी धावपळ, ‘धनुष्यबाण’ आमचाच : उध्दव ठाकरे

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
शिवसेनेचा निवडणूक चिन्ह टिकवण्यासाठी धावपळ, ‘धनुष्यबाण’ आमचाच : उध्दव ठाकरे

शिवसेनेचा निवडणूक चिन्ह टिकवण्यासाठी धावपळ, 'धनुष्यबाण' आमचाच : उध्दव ठाकरे

वार्ता संग्रह

July 2022
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Jun   Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697