Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमरावतीत २५ हजार महिलांना ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत अपात्र ठरवले; पैसे परत घेणार का?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

अमरावतीत २५ हजार महिलांना ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत अपात्र ठरवले; पैसे परत घेणार का?

admin
Last updated: 2025/08/09 at 5:29 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

अमरावती, 9 ऑगस्ट –
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत अमरावती जिल्ह्यातील ६ लाख ९८ हजार ५३६ लाभार्थ्यांपैकी तब्बल २५ हजार ६७ महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेत अर्जांची पुन्हा पडताळणी केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली. आता सरकार या महिलांकडून आधी मिळालेली रक्कम परत घेणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महिला व बालविकास विभागाने इतर शासकीय विभागांकडून माहिती मागवून लाभार्थ्यांची ओळख पडताळली. यात अनेकांनी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतल्याचे, एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, वार्षिक उत्पन्न निकषापेक्षा जास्त असल्याचे, चारचाकी वाहन मालकी, नोकरीत असणे, अपूर्ण दस्तावेज किंवा खोटी माहिती देणे अशा बाबी आढळल्या. ५,९४२ महिलांकडे चारचाकी वाहन असल्याचेही प्रादेशिक परिवहन विभागाच्या माहितीवरून समोर आले, ज्यामुळे त्यांना लाभ थांबवण्यात आला.

२४४ महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतला आहे. मात्र आधीच काही महिने हप्ता घेतल्यानंतर अपात्र ठरलेल्या महिलांकडून रक्कम वसूल केली जाणार का, हे स्पष्ट नाही. जर पैसे परत घेतले नाहीत, तर हा आर्थिक भार सर्वसामान्यांवर पडेल, असेही प्रश्न उपस्थित होत आहेत.

राज्य सरकारने निवडणूक काळात दरमहा २,१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप बहिणींना १,५०० रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळालेली नाही, यामुळे नाराजी वाढली आहे.

You Might Also Like

कठोर परिश्रम केल्यास जग भारताचं ऐकेल – नितीन गडकरी

प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगेंची लातूरमध्ये सदिच्छा भेट

सोलापूर-मुंबई-दिल्ली विमान सेवा सुरू करण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

सामाजिक न्याय विभागात राज्यातील महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सकारात्मक चर्चा – संजय शिरसाठ

शासन वारकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहील – संजय शिरसाठ

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दहावी-बारावी पुरवणी परीक्षेसाठी खासगी नोंदणीला सुरुवात
Next Article मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Latest News

भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध देशांकडून शुभेच्छा
देश - विदेश August 15, 2025
पंतप्रधान मोदींचा लाल किल्ल्यावरून सर्वात प्रदीर्घ भाषणाचा विक्रम
देश - विदेश August 15, 2025
“न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी
देश - विदेश August 15, 2025
कठोर परिश्रम केल्यास जग भारताचं ऐकेल – नितीन गडकरी
महाराष्ट्र August 14, 2025
प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगेंची लातूरमध्ये सदिच्छा भेट
महाराष्ट्र August 14, 2025
भटक्या कुत्र्यांवरील आदेशाला स्थगिती मागणीप्रकरणी निर्णय राखून ठेवला – सर्वोच्च न्यायालय
देश - विदेश August 14, 2025
चर्चेनंतर युद्ध थांबवले नाही तर रशियाला गंभीर परिणाम – ट्रम्प
देश - विदेश August 14, 2025
सर्वोच्च न्यायालयातर्फे माजी न्यायाधीश एल. नागेश्वर राव यांची बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल म्हणून नियुक्ती
देश - विदेश August 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?