सोलापूर, 7 जुलै (हिं.स.)।
उजनी धरण क्षेत्रात मेमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे २० जून पासून उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले होते यामध्ये २० जून ते ३ जुलै या कालावधीत उजनी धरणाच्या दरवाजातील विसर्गाबरोबरच विद्युत प्रकल्पासाठी देखील एक हजार ६०० क्यूसेकने विसर्ग सोडला जात होता. या कालावधीत तब्बल ३.७८३ दशलक्ष युनिट म्हणजे ३७ लाख ८३ हजार युनिट वीज तयार झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यासह पुणे आणि नगर जिल्ह्याच्या काही भागासाठी वरदान ठरलेले उजनी धरण यंदा मी महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सत्तरी पास करून पुढे चाललेले होते. यामुळे साठवण पाण्याचे योग्य नियोजन व्हावे म्हणून २० जून पासून उजनी धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्याचवेळी वीज निर्मितीसाठी ही १ हजार ६०० क्यूसेक ने पाणी सोडण्यात आले.