Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्रात 365 चा वापर करणं एवढं सोपं नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना फटकारले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

महाराष्ट्रात 365 चा वापर करणं एवढं सोपं नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना फटकारले

Surajya Digital
Last updated: 2020/10/17 at 11:11 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर :  महाराष्ट्रात कलम 365 अर्थात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. महाराष्ट्रात 365 चा वापर करणं एवढं सोपं नाही. बहुमत असल्यानंतर कोणीही लगेच सरकार पाडू शकत नाही. त्यामुळे उगाचच अनावश्यक चर्चा करु नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना फटकारलं.

अजित पवार सध्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. अतिवृष्टी व पूरबाधित भागांची ते पाहणी करत आहे. सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली.

सोलापूर जिल्ह्याचा वर्षाचा निम्मा पाऊस एकाच वेळी पडला आहे. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री सोमवारी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. तर उद्या शरद पवार हे उस्मानाबादला जाणार आहेत. अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. एकूण 18 लोक मृत्यूमुखी पडले. अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे. त्या ठिकाणी महावितरणचे कर्मचारी पोल उभे करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

लोक म्हणतात की राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा. पण अजून तशी परिस्थिती नाही. फळबाग आणि पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावेत, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिसीद्वारे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. पण केंद्राची भरीव मदत लागणार आहे. केंद्रीय पथकाने यावे आणि राज्यातील पूरग्रस्त भागाचा सर्व्हे करावा. त्यामुळे नुकसानीचा अंदाज येईल, असं अजित पवार या वेळी म्हणाले. मुख्यमंत्री स्वतः येवून जे काही मदत द्यायची असेल ती ते स्वतः जाहीर करतील, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

* 60 हजार कोटी रुपयांचं कर्ज काढले

एप्रिलपासून सहा महिन्यापासून कोरोना, सार्वजनिक आरोग्य खाते, पोलीस खाते, मदत पुनवर्सन यांचं मानधन दिलं आहे. राज्याने 60 हजार कोटी रुपयांचं कर्ज काढलं आहे. केंद्र सरकार सुरुवातीला कोरोनाच्या नियंत्रणासाठी लागणाऱ्या वस्तू देत होतं. मात्र आता मास्क, सॅनिटायझर, व्हेंटिलेटर देणे बंद केले आहे

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

TAGGED: #महाराष्ट्र #365राष्ट्रपतीराजवट #सोपे #विरोधक #फटकारले #60हजारकोटी #कर्ज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article फडणवीस – दरेकर करणार सोलापूर, मराठवाडा दौरा; शेतकर्‍यांच्या भेटी घेणार
Next Article यूपीतील गुन्ह्यांचे सत्र कायम; भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?