नवी दिल्ली, 24 जुलै (हिं.स.) – देशाच्या राजधानीत या वर्षीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तब्बल ७८८० लोक बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १ जानेवारी ते २३ जुलै २०२५ या कालावधीत ही प्रकरणं नोंदवण्यात आली असून, त्यामध्ये ४७५३ महिला आणि ३१३३ पुरुष यांचा समावेश आहे. ही माहिती झोनल इंटिग्रेटेड पोलिस नेटवर्क (ZIPNET) च्या अहवालातून समोर आली आहे.
झीपनेट हा बेपत्ता व्यक्ती आणि अज्ञात मृतदेह शोधण्यासाठी वापरला जाणारा केंद्रस्तरीय डेटाबेस असून, देशभरातील विविध राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशांतील पोलिस खात्यांचा डेटा यात समाविष्ट केला जातो.
सर्वाधिक बेपत्ता प्रकरणे कुठे?
झीपनेटच्या आकडेवारीनुसार, बाह्य उत्तर दिल्ली जिल्हा (बवाना, स्वरूप नगर, समयपूर बडली भाग) येथे सर्वाधिक ९०८ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ईशान्य जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून तिथे ७३० बेपत्ता प्रकरणे समोर आली आहेत.
अन्य भागांतील स्थिती पुढीलप्रमाणे:
-
दक्षिण पश्चिम दिल्ली: ७१७ प्रकरणे
-
आग्नेय दिल्ली: ६८९ प्रकरणे
-
बाह्य जिल्हा: ६७५ प्रकरणे
-
द्वारका: ६४४ प्रकरणे
-
वायव्य जिल्हा: ६३६
-
पूर्व दिल्ली: ५७७
-
रोहिणी: ४५२
-
मध्य दिल्ली: ३६३
-
उत्तर दिल्ली: ३४८
-
दक्षिण दिल्ली: २१५
-
शाहदरा: २०१
-
नवी दिल्ली जिल्हा: सर्वात कमी ८५ प्रकरणे
अज्ञात मृतदेहांचाही मोठा आकडा
या सात महिन्यांत १४८६ अज्ञात मृतदेह सापडले आहेत, त्यापैकी बहुतेक पुरुषांचे आहेत. यामध्ये उत्तर दिल्ली जिल्ह्यात सर्वाधिक ३५२ मृतदेह आढळले असून, त्यात कोतवाली, सब्जी मंडी आणि सिव्हिल लाईन्स भागांचा समावेश आहे.
इतर जिल्ह्यांतील अज्ञात मृतदेहांची आकडेवारी:
-
मध्य दिल्ली: ११३
-
वायव्य जिल्हा: ९३
-
आग्नेय दिल्ली: ८३
-
आऊटर जिल्हा: ६५
-
पूर्व व नवी दिल्ली: प्रत्येकी ५५
-
पश्चिम व बाह्य उत्तर जिल्हा: प्रत्येकी ५४
-
रोहिणी: ४४
-
शाहदरा: ४२
-
द्वारका: ३५
-
दक्षिण जिल्हा: २६
-
रेल्वे परिसर: २३
राजधानीतील वाढते बेपत्ता व अज्ञात मृतदेह प्रकरणे प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहेत, आणि यावर ठोस पावले उचलण्याची गरज अधिकच तीव्रतेने जाणवत आहे.