Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सरपंच परिषदेच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची शासनाला नोटीस; पालकमंत्र्यांकडून प्रशासक नियुक्तीस विरोध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सरपंच परिषदेच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची शासनाला नोटीस; पालकमंत्र्यांकडून प्रशासक नियुक्तीस विरोध

Surajya Digital
Last updated: 2020/07/21 at 9:51 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

बार्शी : कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतीवर पालकमंत्र्यांकरवी प्रशासक नियुक्तीस विरोध करत, सरपंच परिषदेने उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केेलेल्या जनहित याचिकेवर, न्यायालयाने शासनाला नोटीस बजावली असल्याची माहिती परिषदेचे सरचिटणीस ऍड. विकास जाधव यांनी दिली.

या याचिकेची पुढील सुनावणी आता 7 ऑगस्टला होणार आहे. ऍड. नितीन गवारे हे परिषदेच्यावतीने बाजू मांडत आहेत. राज्यातील सुमारे 14,200 ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाळ मार्च ते डिसेंबर या कालावधीत संपत आहे. कोरोना महामारीमुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यास राज्य निवडणूक आयोगाने असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत पंचायत राज व्यवस्थेत अत्यंत महत्वाची संस्था असलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी गावातील योग्य व्यक्तीची नियुक्ती पालकमंत्र्यांकरवी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

मात्र, त्याबाबत कोणतेही निकष निश्चित केलेले नाहीत. त्यामुळे मनमानीपणे पक्षीय हित जोपासत या नियुक्त्या होणार आहेत. विद्यमान सरपंच यांना प्रशासक म्हणून नियुक्त करणे किंवा ग्रामपंचायत कार्यकाळ सहा महिने वाढविणे हा या पेचप्रसंगावरील सर्वात योग्य उपाय असताना, गावगाडा हाकण्याचा अनुभव आणि क्षमता असलेल्या विद्यमान सरपंच, उपसरपंच, व ग्रामपंचायत सदस्यांना शासनाने या नियुक्तीसाठी जाणीवपूर्वक अपात्र ठरविले आहे.

सर्वाधिकार दिल्यामुळे पालकमंत्री आपआपल्या कार्यकर्त्यांचीच नियुक्ती प्रशासक म्हणून करणार, हे उघड सत्य आहे. नियुक्तीसाठी कसलीही नियमावली नाही किंवा पारदर्शकता नाही. शासनाने याव्दारे लोकशाहीची पायमल्ली केल्यामुळे परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे व प्रदेश सरचिटणीस अँडव्होकेट विकास जाधव यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. सरपंच, उपसरपंच व सदस्य, ग्रामसेवक यांचे पदसिद्ध प्रशासक मंडळ स्थापन करावे, अन्यथा निवडणूक घ्यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरण्यांना सुरुवात

राहुल गांधींना त्यांचाच पक्ष गांभीर्याने घेत नाही – नितीन गडकरी

सोलापूर – काँग्रेस तालुकाध्यक्षावर गुन्हा

सोलापूर – जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर होणार निलंबन

रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सत्यजित पाटणकर भाजपात

TAGGED: #सरपंचपरिषद #ग्रामपंचायत #पालकमंञी #सुनावणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article करमाळा तालुक्यातील १८ जण पाॅझिटिव्ह; तालुक्याची कोरोनाबाधितांची संख्या ५० 
Next Article सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाग्रस्तांची दोन हजारी पूर्ण; आज नव्याने 147 रुग्ण, तीन मृत्यू

Latest News

आयएसएसएफ विश्वचषक २०२५ : सुरुची सिंगने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये जिंकले सुवर्णपदक
महाराष्ट्र June 14, 2025
बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन स्थगित, उदय सामंतांची शिष्टाई
महाराष्ट्र June 14, 2025
भारतीय सैन्यात दाखल झाले 419 कॅडेटस
महाराष्ट्र June 14, 2025
पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा- अजित पवार
महाराष्ट्र June 14, 2025
अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे लोकार्पण
महाराष्ट्र June 14, 2025
शेतात मोती पिकविण्यासाठी सोने-चांदी गहाण
महाराष्ट्र June 14, 2025
शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी
महाराष्ट्र June 14, 2025
सरकारच्या उदासीन धोरणामुळेच शेतकरी व्हेंटिलेटरवर – तुपकर
महाराष्ट्र June 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?