Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलक शेतक-यांनी उपसल्या तलवारी, तणावाचे वातावरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशशिवार

पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलक शेतक-यांनी उपसल्या तलवारी, तणावाचे वातावरण

Surajya Digital
Last updated: 2021/01/26 at 3:18 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांनी दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराजवळ पोलिसांवर तलवारी उगारल्या. दिल्लीत घुसणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या तसेच लाठी चार्ज केला. त्यानंतर काही आंदोलकांची पोलिसांबरोबर चकमक झाली. त्यावेळी काही आंदोलकांनी पोलिसांवर तलवारी उगारल्या.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. या शेतकऱ्यांत विशेषत: पंजाब आणि हरीयाणातल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. असं असलं तरी देशभरातील विविध शेतकरी संघटना आणि श्रमिक संघटनांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सरकार आणि आंदोलकांमध्ये अनेक चर्चाही झाल्या परंतु, या चर्चेत काही तोडगा निघू शकलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून या कायद्यांना स्थगिती देतानाच पाच सदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली. या समितीत कृषी कायद्यांच्या समर्थकांचा सहभाग असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

दरम्यान, आज होणारा प्रजासत्ताकदिन वैशिष्टय़पूर्ण असणार आहे. आज राजपथावर हिंदुस्थानच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झाले. जवानांच्या भव्य परेडनंतर लाखो शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड दिल्लीत सुरू आहे, देशाच्या राजधानीत ‘जय जवान, जय किसान’चा नारा घुमत आहे. दिल्लीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, अर्थसंकल्पाच्या दिवशी 1 फेब्रुवारीला संसदेवर मोर्चा काढण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, सिंघू आणि टिकरी सीमेवर शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेडस् तोडले आहेत. शेतकरी आंदोलक दिल्लीत प्रवेश करत असताना पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आलं. यावेळी पोलीस व शेतकरी यांच्यामध्ये शाब्दिक वाद देखील झाला. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. यावेळी काही आंदोलक शेतकऱ्यांनी तलवारी बाहेर काढल्या त्यामुळे सध्या दिल्ली येथे तणावाचे वातावरण आहे.

* ऐकण्यास तयार नसल्यामुळे अधिकाऱ्यांनी रस्त्यावरच मारली बैठक

कृषी कायद्याविरोधात प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टर परेडला परवानगी दिली होती. परंतु, आंदोलक शेतकऱ्यांनी निश्चित वेळेच्या आणि ठरलेल्या मार्गांपेक्षा इतर ठिकाणांहून परेड नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, अनेक ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. दिल्लीतील नागलोई येथे पोलिस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांनी एकत्र रस्त्यावरच बैठक मारली.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #पोलिसांच्या #लाठीचार्जनंतर #आंदोलक #शेतक-यांनी #उपसल्या #तलवारी #तणावाचे #वातावरण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article या उद्योजकाला पद्मभूषण पुरस्कार देण्यावरुन काँग्रेसला आश्चर्य, यूपीएल कंपनी आणि भाजपचे ‘लागेबांधे’
Next Article संतपरंपरा दर्शविणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथाचे राजपथावर दिमाखदार पथ संचलन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?