मुंबई : कोरोना वाढत आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळेत (ऑफिस टायमिंग) बदल करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यानंतर पोलिस खात्याच्या कार्यालयीन वेळेत बदल केले जाणार आहेत. पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी हे आदेश दिले आहेत. कोरोना संकटामुळे पोलीस कार्यालय 50 टक्के हजेरीवर सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयीन वेळेत बदला करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यानंतर पोलीस खात्याच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आदेश पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी दिले आहेत.
गट अ व गट ब वर्गातील अधिकारी 100 टक्के तर गट क व गट ड उपस्थित 50 % राहतील. 25 टक्के कर्मचारी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या कालावधीत कार्यालयात उपस्थित राहतील तर 25 टक्के कर्मचारी 11 ते 5 या कालावधीत कार्यालयात असतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उर्वरीत क व ड चे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतील मात्र ज्यावेळी तातडीची आवश्यकता असल्यास अधिकारी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावू शकतात. जे कर्माचारी वर्क फ्रॉम होम करणा आहेत ते फोनवर उपलब्ध असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील, तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येतील याचे तत्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी वर्षा येथे मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळी ते बोलत होते. कार्यालयीन वेळांची 10 ते 5 ही मानसिकता बदलण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीत बोलले होते, त्या अनुषंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्य संस्कृतीची सुरुवात करावी असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
कार्यालयीन गट अ आणि गट ब वर्गातील अधिकारी 100 टक्के
गट क व गट ड 50 % कर्मचारी उपस्थित राहणार. त्यापैकी 25 टक्के सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत तर 25 टक्के कर्मचारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत उपस्थित राहतील.
क व ड चे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतील