Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर भारताचा ऐतिहासिक विजय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर भारताचा ऐतिहासिक विजय

Surajya Digital
Last updated: 2021/02/25 at 9:59 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : टीम इंडियाने इंग्लैंड विरोधातील डे-नाइट टेस्ट मध्ये दुसऱ्या दिवशीच सामना जिंकला आहे. इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करत 112 धावा केल्या होत्या. यानंतर भारताने 145 धावा केल्या. इंग्लंडने दुसरा डाव अवघ्या 81 धावात निपटला. भारताला सामना जिंकण्यासाठी 49 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्त्युत्तरादाखल खेळतांना भारताने 10 गडी राखून सामना आपल्या नावे केला.


जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगलेला सामना दुसऱ्या दिवशी जिंकत टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अक्षर पटेलच्या सहा विकेट्स त्याला अश्विनने 3 विकेट घेत दिलेली साथ आणि ईशांत शर्माला मिळालेली एकमेव विकेटच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडचा पहिला डाव 112 धावांत आटोपला.

भारतीय संघ मोठी आघाडी घेईल असे वाटत असताना इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने आपल्या फिरकीतील दाखवलेली जादू आणि लीचने त्याला दिलेली साथ याच्या बळावर इंग्लंडने भारतीय संघाचा पहिला डाव 145 धावांत गुंडाळला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भारतीय संघाला केवळ 33 धावांची आघाडी मिळाली. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय फिरकीसमोर पुन्हा नांगी टाकली. अक्षर पटेलने पुन्हा पाच विकेट घेतल्या. अश्विनच्या चार आणि वॉशिंग्टनने घेतलेली एक विकेट यांच्या फिरकीसमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 81 धावांत गुंडाळला. भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी 49 धावांचे लक्ष्य मिळाले होते. रोहित शर्माने षटकाराने भारतीय संघाचा विजय साकार केला.

मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपली दावेदारी भक्कम केली आहे. दुसरीकडे इंग्लंडचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील एक संघ न्यूझीलंडविरुद्ध फायनल खेळेल. अहमदाबादमधील चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत याचे चित्र स्पष्ट होईल.

* विराटने धोनीचा ‘हा’ विक्रम मोडला

इंग्लंड विरूध्दचा तिसरा कसोटी सामना भारताने दुसऱ्याच दिवशी 10 विकेट्सने जिंकला. विराटसाठी हा विजय खास ठरला. भारतीय मैदानावर कसोटीत सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम विराटने स्वत:च्या नावावर केला. कसोटीत विराटच्या नेतृत्वाखाली मिळवलेला हा 22 वा विजय ठरला. हा विक्रम आतापर्यंत माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नावावर होता. धोनीने भारतात 21 कसोटीत विजय मिळून दिला होता.

You Might Also Like

भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी

भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी

दिग्वेश राठीच्या फिरकीची कमाल, ५ चेंडूत ५ फलंदाजांना केले बाद

बंगळुरूसारखी चेंगराचेंगरी टाळण्यासाठी बीसीसीआयकडून त्रिसदस्यीय समिती

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले सुवर्णपदक

TAGGED: #India's #historicvictory #theworld's #largeststadium, #जगातील #सर्वातमोठ्या #स्टीलकंपनीची #सूत्रे #तरुणउद्योजक #कामगार #कपात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली
Next Article ‘ही फक्त झलक’, अंबानींच्या घरासमोरच्या स्कॉर्पिओमधील पत्रात उल्लेख

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?