Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ब्रेकींग – एक केंद्रशासित प्रदेश अन् 4 राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

ब्रेकींग – एक केंद्रशासित प्रदेश अन् 4 राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा

Surajya Digital
Last updated: 2021/02/26 at 8:15 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

नवी दिल्ली : तमीळनाडूसह पश्चिम बंगाल, आसाम, केरळ या राज्यांबरोबरच पुद्दूचेरी विधानसभा निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत निवडणुकांची घोषणा केली.

आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. 27 मार्चपासून मतदानाला सुरुवात होईल. मतमोजणी 2 मेला होईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका होत असल्यामुळं हे सर्वांसाठी एक आव्हान असल्याचं अरोरा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. केंद्रीय बोर्डाच्या अर्थात सीबीएसईच्या परीक्षांपूर्वी या निवडणुका होतील, असंही अरोरा यांनी स्पष्ट केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये 8 तर, आसाममध्ये तीन टप्प्यात निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तमीळनाडू, पाँडेचेरी आणि केरळ या दक्षिणेतील निवडणुकांसाठी एका दिवशी 6 एप्रिलला मतदान आहे.

पश्चिम बंगालमधल्या 294 जागांसाठी, तमिळनाडूतल्या 234 जागांसाठी, केरळातल्या 140, आसाममधल्या 126 तर केंद्रशासित पुदुच्चेरीतल्या 30 जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण 824 विधानसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. 18.68 कोटी मतदार यासाठी आहेत.

केरळ आणि तमिळनाडूत आणि पुदुच्चेरीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 6 एप्रिलला मतदान होईल आणि 2 मे रोजी मतमोजणी आणि निकाल लागेल.

आसामची निवडणूक 3 टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्याचं मतदान 27 मार्चला होईल. दुसऱ्या टप्याचे मतदान 1 एप्रिल तर तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिलला होईल.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे (TMC) सरकार आहे. यासह केरळमध्ये पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली डावे लोकशाही आघाडीचे सरकार आहे. तर दुसरीकडे आसाममध्ये सर्वांनंद सोनवाल यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन आहे. त्याचवेळी पुडुचेरीमध्ये नारायणस्वामी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सरकार होती जी शेवटच्या काही दिवसात अल्पसंख्याक मध्ये आल्यामुळे पडली. आता तिथे सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे.

यावेळी तामिळनाडूच्या 234, पश्चिम बंगालच्या 294, आसामच्या 126, पुडुचेरीच्या 30 आणि केरळच्या 140 जागांवर निवडणुका होणार आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* या तारखेला होणार मतदान –

– पश्चिम बंगाल – 27 मार्च, 1, 6, 10, 17, 22, 26, व 29 एप्रिल 8 टप्पे

– आसाम – 27 मार्च, 1 व 6 एप्रिल – तीन टप्प्यात मतदान

– केरळ – 6 एप्रिल – एकाच टप्प्यात मतदान

– तामिळनाडू – 6 एप्रिल – एकाच टप्प्यात मतदान

– पाँडेचेरी – 6 एप्रिल – एकाच टप्प्यात मतदान

– 2 मे रोजी निकाल

* बंगालमध्ये 8 टप्प्यांत मतदान

पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक टप्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 01 एप्रिल, तिसरा टप्पा 06 एप्रिल आणि चौथा टप्पा 10 एप्रिलला होईल.

पाचवा टप्पा मतदान 17 एप्रिल, सहावा 22 एप्रिल, सातवा 26 एप्रिल, आठवा टप्पा 29 एप्रिलला होईल. त्यानंतर 2 मेला निकाल लागण्याची शक्यता आहे.

* पश्‍चिम बंगालमधील 294 जागांवर निवडणुका

2016 च्या निवडणूकीत TMC पार्टीने 211 जागांवर विजय मिळवत त्यांचं सरकार स्थापन केलं होत.

त्यावेळी डाव्या आणि काँग्रेसच्या आघाडीला 76 जागा जिंकता आल्या. आणि यावेळी पश्‍चिम बंगालमध्ये आपल्या पूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या भारतीय जनता पक्षाला तेव्हा फक्त 3 चं जागांवर विजय मिळवत समाधान मानाव लागलं होत. बाकी 4 जागा इतरांच्या खात्यात गेल्या होत्या.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपाने 42 पैकी 18 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे सध्या भाजपा विधानसभा निवडणुकीत जोर लावताना दिसत आहे.

* आसाममधील 126 जागांवर निवडणुका

2016 मध्ये 86 जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने आसाममध्ये आपलं सरकार बनवलं होत. कांग्रेसला 26 जागा आणि AIUDF ला 13 जागा मिळाल्या होत्या. इतरांकडे 1 जागा होती.

* तामिळनाडूमधील 234 जागांवर निवडणुका:

134 जागा जिंकून AIDMK आघाडीने सरकार स्थापन केलं होतं. DMK आणि काँग्रेसच्या आघाडीला 98 जागा मिळाल्या होत्या.

* पाँडेचेरीच्या 30 जागांवर निवडणुका 

पाँडेचेरी या केंद्रशासित प्रदेशात 30 जागा आहेत. इथे विधानसभेत 3 नामित सदस्य असतात. आतापर्यंत इथे काँग्रेस आघाडीचे सरकार होते परंतु गेल्याच आठवड्यात काही आमदारांनी काँग्रेस सोडल्यामुळे हे सरकार अल्पसंख्याक झाले. त्यामुळे सध्या इथे राष्ट्रपती राजवट लागू आहे.

* केरळमधील 140 जागांवर निवडणुका 

डाव्या पक्षांचा शेवटचा गड असलेल्या केरळमध्ये 140 जागांवर निवडणुका होणार आहे. इथे डावे पक्ष आणि काँग्रेसचे युतीचे सरकार आहे. डाव्यांकडे 91 आणि काँग्रेसच्या यात 47 जागा आहेत. भाजपा आणि इतरांच्या खात्यात 1 – 1 जागा आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Announcement #Assembly #elections #oneUnionTerritory #4otherstates, #एक #केंद्रशासित #प्रदेश #4राज्यात #विधानसभा #निवडणुकांची #घोषणा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आमदार प्रणिती शिंदेच्या वक्तव्याने सोलापूरच्या राजकारणात खळबळ
Next Article कोलकाता : निवडणुकांच्या तारखा जाहीर; ममता भडकल्या

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?