Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुख्यमंत्री ठाकरेंनी करमाळ्यातून नारायणआबांना घेतले मुंबईला बोलावून, काय झाले ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूरराजकारण

मुख्यमंत्री ठाकरेंनी करमाळ्यातून नारायणआबांना घेतले मुंबईला बोलावून, काय झाले ?

Surajya Digital
Last updated: 2021/02/27 at 8:10 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत अंतर्गत विविध घडामोडी घडत असताना माजी आमदार नारायण पाटील यांना थेट मातोश्रीचा निरोप येणे, हा विषय तास चर्चेचा झाला आहे. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत येऊन धनुष्यबाणावर निवडणूक लढलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वच नेतेमंडळी आपआपल्या सोयीनुसार वागत आहेत. हे उद्धव ठाकरेंनाही उमगले आहे.

शिवसेनेचे विद्यमान आमदार असताना नारायण पाटील यांची उमेदवारी हुकली. तरीही ते शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले, याची जाणीव ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निरोप पाठवून पाटील यांना मुंबईला बोलावून घेतले. त्यांच्याशी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पक्षवाढीसाठी चर्चा केल्याची माहिती आहे.

करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांना विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत उमेदवारी नाकारून केलेली चूक शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दुरुस्त करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. कारण, उमेदवारी न देताही शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले नारायण पाटील यांना राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईला बोलावून घेत त्यांच्याशी सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना पक्षवाढीबाबत चर्चा केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर नारायण पाटील यांनी पाच वर्षांत करमाळा विधानसभा मतदारसंघात केलेली विकासकामे व त्यांचा जनसंपर्क पाहता 2019 च्या निवडणुकीत शिवसेना त्यांची उमेदवारी कापेल, असे स्वप्नातदेखील कोणाला वाटत नव्हते. मात्र, तत्कालीन जलसंधारण मंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी ऐनवेळी रश्‍मी बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आणत करमाळ्याची उमेदवारी दिली.

शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर नारायण पाटील यांनी गेल्या विधानसभेला अपक्ष निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली. या निवडणुकीत अन्य पक्षाकडून ऑफर असतानाही पाटील यांनी अपक्ष लढण्याची भूमिका घेतली. अपक्ष लढूनही त्यांना शिवसेनेच्या उमेदवार रश्‍मी बागल यांच्यापेक्षा 25 हजार मते जास्त मिळाली. त्यांचा या निवडणुकीत निसटता पराभव झाला, त्यांना 75 हजारांच्या घरात मते मिळाली. पाटील यांना झालेले मतदान पाहता शिवसेनेने उमेदवारी डावलून चूक केली, हे सर्वांच्याच लक्षात आले.

शिवसेनेकडून निवडणूक लढून पराभूत झालेले जिल्ह्यातील उमेदवार सोयीनुसार वागत असताना माजी आमदार नारायण पाटील यांनी मात्र शिवसेनेशी आपली नाळ तुटू दिली नाही. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही त्यांनी आपली बाजू भक्कमपणे सांभाळून ठेवली. तसेच, त्यांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्यातील करमाळा ही एकमेव पंचायत समितीही शिवसेनेकडे आहे.

* आगामी काळात पक्षाकडून न्याय मिळणार – पाटील

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला मुंबईला बोलावून घेतले होते. आमची वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या वेळी खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. शिवसेनेने आयत्या वेळी उमेदवारी डावलूनही आपण पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याचे वरिष्ठांनी ओखळले आहे. आगामी काळात न्याय देण्याची भूमिका असेल, असे त्यांनी मला सांगितले आहे, असे करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी नमूद केले.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #Cmthacare #callto #karmala #shivsena #leader #exmlanarayanpatil, #मुख्यमंत्री #ठाकरेंनी #करमाळ्यातून #नारायणआबांना #मुंबईला #बोलावून
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article स्टार धावपटू ‘हिमा दास’ बनली पोलीस उपअधीक्षक, बालपणीचे स्वप्न झाले साकार
Next Article वनमंत्री राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे राज्यभर आक्रमक आंदोलन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?