Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘कोरोना काळानंतर लवकरच उभे राहणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

‘कोरोना काळानंतर लवकरच उभे राहणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य’

Surajya Digital
Last updated: 2021/03/01 at 5:14 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडी सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं भाषण झाले. यावेळी ते म्हणाले की, कोरोना काळात महत्वाचे कार्य करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे आभार. कोरोना काळानंतर लवकरच उभे राहणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. कोरोनाविरोधाची लढाई राज्य सरकारने यशस्वीपणे पेलली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात विविध मुद्द्यावरून वाद झालेले पहावयास मिळाले होते . मात्र आता खुद्द राज्यपालांनी ठाकरे सरकारचे तोंडभरून कौतुक केले आहे.

औद्योगिक मंदी असतानाही राज्य सरकारने चांगले काम केले आहे. रोजगार सुलभ व्हावे म्हणून महारोजगार आणि महाजॉब पोर्टल सुरु केले आहे. राज्य सरकारने आर्थिक अडचण असतानाही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे, अशा शब्दात राज्य सरकारच्या कामाची पोचपावती दिली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून यावेळी अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली.

यावेळी राज्यपालांनी राज्य शासनाच्या कामाचा आढावा मांडला. मात्र दुसरीकडे विरोधकांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. राज्यपालांनी कोरोना योद्ध्यांचे तोंडभरून कौतुक केले तसेच दाटीवाटीचा भाग असलेल्या धारावीत कोरोना रोखण्यासाठी सरकार आणि मुंबई मनपाने राबवलेल्या योजनांच्या कामांचा आढावा घेतला.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हा देशातील अभिनव उपक्रम ठरला आहे. राज्य सरकारची करोना विरुद्धची लढाई सुरु असून सरकारने आता मी जबाबदार ही योजना सुरु केली आहे. करोना संदर्भातील आरोग्य उपाययोजना वाढवण्याची गरज आहे, असे सुद्धा राज्यपाल कोश्यारी यांनी म्हणून दाखविले होते.

You Might Also Like

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

TAGGED: #Governor #himself #praised #Thackeraygovernment, #कोरोना #काळानंतर #लवकरच #उभेराहणारे #महाराष्ट्र #एकमेवराज्य'
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधानांच्या पाठोपाठ शरद पवारांनी घेतली कोरोनाची लस
Next Article दादांच्या पोटातले ओठांवर, हा तर जनतेला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?