Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माजी केंद्रीयमंत्री, भाजप नेते यशवंत सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये सामील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

माजी केंद्रीयमंत्री, भाजप नेते यशवंत सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये सामील

Surajya Digital
Last updated: 2021/03/14 at 10:06 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

कोलकाता : माजी केंद्रीयमंत्री आणि भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर यशवंत सिन्हा यांचा टीएमसी प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. सिन्हा हे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीयमंत्री होते. त्यांनी अर्थमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती.

पश्चिम बंगालसह एकूण 5 राज्यांच्या निवडणुका पुढील महिन्यात होणार आहेत. मात्र, सर्वाधिक राजकीय घडामोडी सध्याच्या घडीला पश्चिम बंगालमध्येच होताना दिसत आहेत. गेल्या तीन दिवसांत एकापाठोपाठ आधी तृणमूल, मग भाजपा आणि नंतर काँग्रेस अशा तिन्ही प्रमुख पक्षांनी आपल्या स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर करून महिन्याभरात प्रचाराचा रणसंग्राम कसा रंगणार आहे याचीच झलक दाखवली. आता एकेकाळी भाजपाच्या कोअर ग्रुपमध्ये गणले जाणारे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राहिलेले यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. वयाच्या ८३ व्या वर्षी यशवंत सिन्हा यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे नेमकी यामागे तृणमूल काँग्रेसची काय चाल आहे? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

एकेकाळी भाजपाच्या थिंक टँकमध्ये यशवंत सिन्हा यांचा समावेश होता. मात्र, पक्षासोबत झालेल्या पराकोटीच्या मतभेदांमुळे यशवंत सिन्हा यांनी २०१८ मध्ये भाजपाला रामराम ठोकला. पण त्यांचा मुलगा जयंत सिन्हा मात्र अजूनही भाजपाकडून कार्यरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये ते हवाई वाहतूक राज्यमंत्री देखील होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

भाजपाला रामराम ठोकल्यापासून यशवंत सिन्हा राजकीय जीवनापासून विलग झाले होते. मात्र आता पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या ऐन महिनाभर आधी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करून चर्चेची राळ उडवून दिली आहे. तृणमूल काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी गेल्या काही दिवसांमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय अडचणीत सापडलेल्या तृणमूल काँग्रेसला यशवंत सिन्हा यांच्या पक्षप्रवेशामुळे किती फायदा होईल? याविषयी तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

* यशवंत सिन्हांची राजकीय कारकीर्द

यशवंत सिन्हा हे मूळचे बिहारचे आहेत. १९६० मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड झाली. आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये देखील अनेक महत्त्वाच्या पोस्टवर काम केलं. १९८४ मध्ये त्यांनी राजीनामा देऊन जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि ते राजकारणात सक्रीय झाले. १९८८ मध्ये पक्षाकडून त्यांना राज्यसभेवर देखील पाठवण्यात आलं. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या काळात यशवंत सिन्हा यांनी केंद्रीय अर्थमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. त्यांच्याच काळात म्हणजे १९९०-९१ मध्ये भारताच्या प्रख्यात खासगीकरण, जागतिकीकरण धोरणाची बिजं रोवली गेली.


१९९६ मध्ये यशवंत सिन्हा भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते झाले. पुन्हा वाजपेयी सरकारमध्ये १९९८मध्ये त्यांच्यावर अर्थमंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. २००२ मध्ये ते देशाचे परराष्ट्रमंत्री देखील राहिले आहेत. २००९ मध्ये त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पुढची १० वर्ष यशवंत सिन्हा पक्षात कार्यरत होते, मात्र, त्यांना फारशी मोठी जबाबदारी सोपवली गेली नाही. मधल्या काळात त्यांनी अनेकदा जाहीरपणे पक्षविरोधी भूमिका देखील घेतल्या. अखेर २०१८ मध्ये त्यांनी भाजपाला रामराम ठोकला. त्यावेळी देशातली लोकशाही धोक्यात आली आहे, असं त्यांनी केलेलं विधान बरंच गाजलं होतं.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

TAGGED: #Former UnionMinister #BJPleader #YashwantSinha #joins #TrinamoolCongress, #माजीकेंद्रीयमंत्री #भाजपनेते #यशवंतसिन्हा #तृणमूलकाँग्रेसमध्ये #सामील
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सचिन वाझेंना एनआयएकडून अटक, त्यांच्याविरोधातील 6 मोठी कलमं
Next Article धोनीने सांसारिक मोह मायेपासून संन्यास घेतला आहे का ?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?