Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: डॅमेज कंट्रोलमुळे गृहमंत्री देशमुखांना हटवण्याच्या हालचाली
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

डॅमेज कंट्रोलमुळे गृहमंत्री देशमुखांना हटवण्याच्या हालचाली

Surajya Digital
Last updated: 2021/03/15 at 7:11 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या हाती लागलेल्या माहितीनंतर अनेक खळबळजनक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकार सावध झाल्याचे दिसत आहे. काहीवेळापूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली आहे.

सचिन वाझे प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो किंवा मुंबई पोलिस आयुक्तांना पदावरून दूर केले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. नाना पटोलेही मुख्यमंत्र्यांना भेटले. तसेच मंत्रिमंडळातील बदलासंदर्भात सोनिया गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे पटोलेंनी यांनी म्हटले.

एनआयएच्या तपासात सचिन वाझेंवर काही आरोप ठेवण्यात आले आणि त्यांना अटक करून निलंबित केले. अशा परिस्थितीत, ‘सचिन वाझेंना पाठीशी घालणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘जाणता राजा’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या पक्षाचा गृहमंत्री जर एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला पाठीशी घालत असेल तर ही खूपच खेदजनक बाब आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचा राजीनाम घेतला गेलाच पाहिजे. किंवा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे”, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या बैठकीत शिवसेना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख अपयशी ठरले. त्यामुळे त्यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे सरकारमधील काही नेत्याचे म्हणणे आहे.

त्यानंतर आज सायंकाळी काही वेळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीचे कारण जरी मंत्र्यांची झाडाझडती असल्याचे सांगण्यात येत असले तरी सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडी सरकारचे पाय खोलात अडकल्याने या प्रकरणात डॅमेज कंट्रोल कशाप्रकारे करायचे, याविषयी चर्चा होणार असल्याचे कळते. तर अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा की त्यांनाच कायम ठेवायचं यावर चर्चा होणार आहे.

तर दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख हे सुशांतसिंग राजपूत, पूजा चव्हाण आणि आता मनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका सरकारमधील काही बड्या नेत्यांनी ठेवला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी गृहमंत्रीपद कोणा बड्या नेत्याकडे देण्याचे विचार करत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे नावं आघाडीवर आहेत.

* गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही : जयंत पाटील

सचिन वाझे प्रकरणी ठाकरे सरकारच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात काही तास बैठक झाली. वाझे प्रकरणी ठाकरे सरकारची चांगलीच अडचण झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री बदललं जाण्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Movements #remove #HomeMinister #Deshmukh #due #damagecontrol, #डॅमेजकंट्रोलमुळे #गृहमंत्री #देशमुखांना #हटवण्याच्या #हालचाली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आमदार पडळकरांनी फडणवीसांचा केला ‘शेतकरी हृदयसम्राट’ म्हणून उल्लेख
Next Article गटनेते पदाच्या वादातून स्थायी आणि परिवहन समितीच निलंबित; भाजप न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?