Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विद्यार्थ्यांना कोरोना काळात मोठा दिलासा; अभ्यासक्रमात २५ टक्‍के कपात करण्याचा निर्णय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांना कोरोना काळात मोठा दिलासा; अभ्यासक्रमात २५ टक्‍के कपात करण्याचा निर्णय

Surajya Digital
Last updated: 2020/07/26 at 10:40 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई  : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. अद्यापही शाळा प्रत्यक्षात सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांच्या मनावर ताण, दडपण येऊ नये यासाठी सन  २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्‍के कपात करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलची माहिती एससीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. कोरोना संकट काळात विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या हेतूनं अभ्यासक्रमात कपात करण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)

पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कपात करण्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

‘कोरोना संकटाच्या काळात आपण १५ जूनपासून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी विविध माध्यमांतून शिक्षणाचे मार्ग आपण सुरू केले आहेत,’ असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा ताण विद्यार्थ्यांवर येऊ नये, त्यांनी कोणतंही दडपण घेऊ नये यासाठी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात २५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. कपात करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची यादी संचालक राज्य शैक्षणिक व संशोधक परीक्षक महाराष्ट्र, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

* या संकेतस्थळावर अभ्यासक्रम उपलब्ध

इयत्ता १ ली ते १२ वीचा इयत्तानिहाय, विषयनिहाय २५ टक्के पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला भाग www.maa.ac.in आणि www.ebalbharati.in या संकेतस्थळांवर प्रकाशित करण्यात आला आहे. शाळा प्रमुखांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सदर पाठ्यक्रम वगळल्याची नोंद घेऊन त्याबाबत सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना अवगत करण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

“शैक्षणिक वर्ष १५ जूनला सुरू झाले. शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरू राहिले पाहिजे म्हणून विविध माध्यमांतून शिक्षणाचे मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. पण अजूनही प्रत्यक्ष शाळा सुरू झालेल्या नाहीत. अशा परिस्थिती मुलांच्या मनात तणाव राहू नये, विद्यार्थ्यांना दडपण येऊ नये, या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमाने अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे”
– प्रा. वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

TAGGED: #अभ्यासक्रमातकपात #विद्यार्थांनादिलासा #25टक्केकपात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गृहराज्यमंञ्यांनी घेतली कोरोना आढावा बैठक; जिल्ह्यात 43 पोलिसांना कोरोनाची लागण
Next Article राज्यातील पहिलीच कारवाई; ठाण्यातील खासगी रुग्णालयाची नोंदणी रद्द

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?