Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सीरमवर केंद्राचे कंट्रोल, म्हणूनच राजकारण केले जाते – अजित पवार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

सीरमवर केंद्राचे कंट्रोल, म्हणूनच राजकारण केले जाते – अजित पवार

Surajya Digital
Last updated: 2021/04/08 at 3:12 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर / पंढरपूर : लोकांना लॉकडाऊन नको आहे. शेवटी माणसंही जगली पाहिजेत. 18 वर्षांच्या पुढील लोकांना लस द्या. परदेशात लस पाठवण्याच्या आधी आपल्या देशात लस द्या. स्वतःचं पोट उपाशी ठेवून शेजाऱ्याला लस दिले जाते. आपल्याकडे यंत्रणा आहे. सीरमवर केंद्राचं कंट्रोल आहे, नाहीतर आम्ही सीरमला लस द्यायला सांगितलं असतं. मात्र राजकारण केले जाते.” असंही अजित पवार म्हणाले.

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1380054409380462592?s=19

राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालकेंच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी केंद्रावर टीका केली. यावेळी कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावरही पवारांनी वेगळ्या शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. “कल्याणराव काळे पवार साहेबांकडे चालले, असं समजलं की भाजप नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं. भाजपचे सगळेच कल्याणरावांच्या घरी जायला लागले. शरद पवार साहेबांचा कल्याणराव काळे यांना निरोप आहे, की भगीरथ चांगल्या मतांनी निवडून आला पाहिजे.” असं अजितदादांनी कल्याणरावांना सांगितलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अजित पवार म्हणाले, पाच वर्षांसाठी इथल्या जनतेने भारत नानांना निवडून दिले होते, त्यांचं काम पण सुरु होतं, मात्र काळाने घाला घातला. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांनी भगीरथ भालकेला विधानसभेत पाठवायचे आहे. भगीरथ भालके यांनी भारत नानांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करावे, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सर्व ताकद लावीन” अशी हमी अजित पवारांनी दिली.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1380093212807720961?s=20

* प्रश्न सोडवण्याची धमक फक्त महाविकास आघाडीत

“हे पांडुरंगा राज्यावर आलेलं कोरोनाचं संकट दूर कर” असं म्हणत अजित पवारांनी पांडुरंगाला साकडे घातले. “कोरोना राज्यात वाढलाय. त्यासाठी नियम पाळावे लागतायत. कोरोना नियंत्रणसाठी केंद्राने लस द्यायला पाहिजे. जनतेने आमच्यावर प्रेम केले म्हणून तीस वर्षे राजकारणात आहोत. भाजप हा ग्रामीण भागात फारसा लोकप्रिय नाही. अजून काही प्रश्न सोडवायचे आहेत, हे प्रश्न सोडवण्याची धमक फक्त महाविकास आघाडीत आहे. काळानुरुप नवीन लोकांना संधी द्यावी लागते” असंही अजित पवार म्हणाले.

* …हा शहाणा सांगतो मास्क काढा

पंढरपुरात अजित पवारांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी अजित पवार बोलायला उभे राहिले. अजित पवार भाषण करत असताना त्यांना एक चिठ्ठी आली. त्यावर “दादा मास्क काढा” असं लिहिलेलं होतं. ती चिठ्ठी अजित पवारांनी जाहीर वाचून दाखवली. “मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा म्हणून” असं अजितदादा म्हणताच एकच हशा पिकला.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1380051676044816384?s=19

* कल्याणराव काळेंच्या घरी काढला व्यापा-यांचा रुसवा

उपमुख्यमंत्री अजित पवार पोटनिवडणूक प्रचारासाठी पंढरपूरमध्ये आले आहेत. राज्यात वाढत आसलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे निर्बंध कडक करीत काही सेवा वगळता लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यापारी नागरिक नाराज आहेत. अजित पवार येताच त्यांनी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेत रुसवा काढण्यात वेळ घालवला.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1380019317660475392?s=19

कल्याणराव काळे यांच्या घरी झालेल्या बैठकीत त्यांनी व्यापाऱ्यांच्या तक्रारी एकूण घेतल्या व राज्यात कोरोनाची परिस्थिती किती गंभीर आहे याबाबत व्यापाऱ्यांना सूचित केले. मात्र राज्य सरकार व्यापाऱ्यांसोबत असून येत्या दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन अजित पवार यांनी व्यापाऱ्यांना दिले.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #Centre's #control #serum #politics #being #done #Ajit Pawar, #सीरमवर #केंद्राचं #कंट्रोल #राजकारण #केलेजाते #अजितपवार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारतातून न्यूझीलंडमध्ये जाणा-यांना ‘नो एन्ट्री’
Next Article मुळात कोरोना हा रोग नाही, कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला, मूर्खपणा आहे – संभाजी भिडे

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?