Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गेली मदत कुणीकडे ? राहुल गांधींचा सरकारला सवाल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

गेली मदत कुणीकडे ? राहुल गांधींचा सरकारला सवाल

Surajya Digital
Last updated: 2021/05/06 at 5:23 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताला परदेशातून मोठी मदत मिळाली आहे. ही मदत नेमकी गेली कुठे? असा सवाल आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारला आहे. ‘भारताला आतापर्यंत कोणत्या वस्तू मिळाल्या, त्या कुठे आहेत, त्याचा कुणाला फायदा होत आहे का, राज्यांना त्याचे वाटप करण्याची पद्धत काय आहे, यात पारदर्शकता आहे की नाही ?’ असे सवाल राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; ज्वालाग्राही युरेनियमचा मोठा साठा जप्त https://t.co/3z8htgFV1O

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 6, 2021

देशात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळं परिस्थिती गंभीर झाली आहे. स्थिती गंभीर  असताना भारताला अनेक देशांकडून मदत मिळत आहे. यामध्ये आर्थिक मदतीसह मेडिकलसंबंधी गोष्टी देखील मिळत आहेत. मात्र या मदतीवरुन राजकारण होत असल्याचं समोर येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला विदेशांकडून मिळणाऱ्या मदतीवरुन प्रश्न विचारले आहेत. या मदतीचा फायदा कुणाला होत आहे? असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1390262981158600707?s=19

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

देशात दररोज कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची भर पडत असताना आता यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आधीही टीका केली होती. देशात कोरोनाची दुसरी लाट हाहाकार माजवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर विजय मिळवल्याचं आधीच श्रेय घेत आहेत असं सांगत ते म्हणाले होते की, भारतातील कोरोना परिस्थितीवरून संपूर्ण जगभरात चिंता व्यक्त केली जात असताना मोदी सरकार मात्र आपली प्रतिमा निर्माण करण्याच्या कामात व्यस्त आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1389890106509643778?s=20

काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते की, “आत्मनिर्भर होण्याचा उद्देश आहे. कोणीही आता आपल्या मदतीला येणार नाही, पंतप्रधान सुद्धा नाहीत. देशातील कोरोनाची स्थिती आता नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि केंद्र सरकार आता त्याची जबाबदारी राज्यांवर ढकलत आहे. वैज्ञानिकांनी वारंवार सूचना देऊनही सुरुवातील कोरोनाचा धोका ओळखायला मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.”

https://twitter.com/SurajyaDigital/status/1390256174105202689?s=19

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले होते की, “भारत हा जगातील पहिलाच देश आहे की ज्या देशात विशेषज्ञ आणि तज्ज्ञांच्या मदतीशिवाय, त्यांच्या सल्ल्याशिवाय कोरोना विरोधात लढा लढला जातोय. लोकांचा जीव वाचवण्यासाठी, योग्य नियोजनासाठी आणि सकारात्मक निर्णयासाठी या तज्ज्ञांची मते आणि सूचना या अत्यंत महत्वाच्या असताना भारतात त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय.”

https://twitter.com/SurajyaDigital/status/1390234141606563846?s=19

* राहुल गांधींनी विचारलेला प्रश्न

1-विदेशातून कोविडसाठी किती मदत भारताला मिळाली?
2- ही मदत कुठे आहे?
3- या मदतीचा फायदा कुणाला होतोय?
4- कशा पद्धतीनं राज्यांमध्ये या मदतीचं वाटप केलं? 
5- यामध्ये पारदर्शकता का नाही?

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

TAGGED: #Who #last #help? #RahulGandhi's #question #government, #गेली #मदत #कुणीकडे #राहुलगांधींचा #सरकारला #सवाल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; ज्वालाग्राही युरेनियमचा मोठा साठा जप्त
Next Article मॅरेथॉन जिंकणाऱ्या लताच्या पतीचा कोरोनाने घेतला बळी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?