Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंञिमंडळाच्या आजच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत झाली चर्चा आणि काही निर्णय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

मंञिमंडळाच्या आजच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत झाली चर्चा आणि काही निर्णय

Surajya Digital
Last updated: 2020/07/29 at 7:11 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज बुधवारी पार पडली. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शासकीय कंत्राटदारांना चालू कंत्राटाबाबत अडचणींसंदर्भात उपाययोजना व सहाय्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे 31 जुलैनंतर लॉकडाऊन किती दिवस करावा, याबाबतही चर्चा करण्यात आली.

देशासह राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेक क्षेत्रात मोठे बदल करण्यात आले आहे. अनेक निवडणुकीही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, आता अनेक गोष्टी पुन्हा हळूहळू सुरळीत होण्यास सुरुवात होत आहे. त्यातच राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मंञिमंडळ बैठकीत चर्चा झाली असली तरी याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत.
31 जुलैनंतर लॉकडाऊन ठेवण्यात येईल. दर आठ दिवसांनी परिस्थितीनुसार एक-एक व्ययसायाला सूट दिली जाण्याची शक्यता आहे. कुठल्या भागात सूट द्यावी, याविषयी चर्चा करण्यात आली. लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये ज्या लोकांची परिस्थिती बिघडली आहे, ती आर्थिक परिस्थिती लक्षात घेता मंत्रिमंडळात चर्चा झाली. वीज दराबाबत एमएआरसी ठरवते. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली नसलेल्यांना सवलत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. निर्णय सर्व वीज कंपन्यांना बंधनकारक आहे. पुढच्या कॅबिनेटमध्ये हा विषय येणार आहे. 93 टक्के ग्राहकांना हा फायदा होणार आहे.

तसेच धार्मिक सण कोणताही असो सरकारचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकच असतो. याबाबत राज्य सरकारने गाईडलाईन जारी केला आहे. राज्यातील मागासवर्गीय कर्मचारी यांची पदोन्नती थांबली होती. उच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार असून यासाठी सरकार वकील देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

* वीजबिलाबाबत दिलासा देण्याची चर्चा

राज्यभर वीज बिलाबाबत तक्रारी येत आहेत. त्याबाबत बैठक काल झाली. आज देखील चर्चा झाली ग्राहकांना दिलासा देण्याची चर्चा झाली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत. मागील बिलांचा आढावा घेऊन सरासर बिल दिले जाईल. मुख्यमंत्री कोविडबाबत राज्याचे हिताचे निर्णय घेत आहेत. मुंबई एमएएमआरमध्ये कोविड प्रमाण कमी होत आहे. मुख्यमंत्री गुरूवारी पुण्याचा दौरा करणार आहेत. या आधी मुख्यमंत्र्यांनी निसर्ग चक्रीवादळनंतर रायगड जिल्ह्याचा दौरा केला होता.

* मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय

– धर्मादाय संघटनेतील पदोन्नती साखळीत समतोल साधणे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० मधील कलम 5 मधील पोट-कलम (2 अ) मध्ये सुधारणा करण्यास मान्यता.

– केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शासकीय कंत्राटदारांना चालू कंत्राटाबाबत अडचणींसंदर्भात उपाययोजना व सहाय्य करण्याचा निर्णय.

– विधानमंडळाचे सन 2020 चे तिसरे (पावसाळी) अधिवेशन 7 सप्टेंबर रोजी पासून आयोजित करण्यास मान्यता

– महाराष्ट्र अॅग्रीबिझिनेस नेटवर्क प्रकल्प व आशियाई विकास बँकेशी करार करण्यास मान्यता

– कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेत अंतर्गत विशाल प्रकल्पांसाठी गुंतवणुकीचे आणि रोजगाराचे निकष सुधारण्यास मान्यता.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #मंञीमंडळ #बैठक #निर्णय #लॉकडाऊन #आर्थिक #राजकीय #परिस्थिती
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेमध्ये नागरिकांसाठी कॉल सेंटर सुरू
Next Article रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरावर केला चाकू हल्ला; डॉक्टरामधून तीव्र संताप, तीव्र निषेध

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?