टेंभुर्णी : प्रसार माध्यमांसमोर येऊन तोंडी आश्वासन देऊन ५ दिवसांनंतरही लेखी आदेश न मिळाल्यामुळे आज सोमवार (ता.24) आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी 14 व्या दिवशी भीमानगर येथे उजनी धरणाच्या गेटवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा पुतळा जाळून निषेध केला.
उजनी धरणाच्या गेटवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा पुतळा जाळला (संतोष वाघमारे -टेंभुर्णी )#surajyadigital #ujjain #सुराज्यडिजिटल #जयंतपाटील #jayantpatil #पुतळा #status https://t.co/TA5BOjq4HY
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
यावेळी उद्यापासून सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते प्रभाकर देशमुख व त्यांचे टीमने दिली. मागील अअधिवेशनात वीज बिलापोटी शेतक-यांची लाईट कट करणार नसल्याचे सांगितले, माञ अधिवेशन संपताच लाईट तोडण्यास सुरूवात केली. यामुळे शेतक-यांचा सरकार वरचा विश्वास उडाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शांततेत सुरु असलेल्या आंदोलनांनी धारण केले उग्र स्वरुप, पंढरपूर तालुक्यात पेटली आंदोलनाची ठिणगीhttps://t.co/In7vrDsEqZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
आतासुद्धा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन तोंडी आश्वासन देऊन लेखी आदेश काढला नाही. या प्रकरणात ही जलसंपदा मंत्री लेखी आदेश द्यायला चालढकल करीत असल्याने आमचं सरकारवर विश्वास राहिला नाही.
त्यामुळे, जोपर्यंत इंदापूरकडे वळवण्यात येणारे 5 टीएमसी पाणी रद्द करण्यात आल्याचा लेखी आदेश हातात देणार नाही, तोपर्यंत आम्ही विविध मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्रात सोलापूरसह 14 जिल्ह्यांतील लॉकडाऊन वाढणार https://t.co/es598EEATJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 24, 2021
यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापु जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता व्यवहारे, रयत क्रांती संघटना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.सुहास पाटील, विठ्ठल मस्के, अमोल जगदाळे, सचिन पराडे पाटील,रामदास खराडे, मल्हारी गवळी, प्रशांत महाडिक, धवल पाटील, मंगेश वाघ,दादासो गायकवाड, अतुल भालेराव,अंकुश महाडिक, नारायण गायकवाड, तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड, गणेश उजगीरे,सिध्दार्थ भास्कर, दत्ता आरकिले, विजयराजे खराडे, संजय नवले, श्रीराम महाडिक उपस्थित होते.