सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्ग रोखण्याच्या हेतूने २३ एप्रिलपासून कडक लॉकडाउन लागू करण्यात आला. या काळात शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत कारवाई करताना जवळपास ३२७ वाहने पोलिसांनी जप्त केली.आता त्या वाहनांची सुटका करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1397085816711618560?s=19
संबंधित वाहनचालकांनी कागदपत्रे दाखवून दंड भरून वाहन घेऊन जाण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी केले आहे.कडक लॉकडाउनच्या १ ते १५ मे या काळात जप्त केलेल्या वाहनांची सुटका आता केली जात आहे.१५ मे नंतर जप्त केलेल्या वाहनांची सुटका १ जूननंतर केली जाईल, असेही पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1396877445224013827?s=19
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जप्त वाहनांची सुटका केल्यानंतर संबंधित वाहनचालकांनी वाहतूक व कोरोनासंबंधीचे नियम पाळणे बंधनकारक आहे, असेही डॉ.कडूकर यांनी स्पष्ट केले. लॉकडाउन काळातील सवलतीचा गैरफायदा घेऊन विनाकारण अथवा किरकोळ कारणासाठी शहरात फिरणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली. काहींना दंड भरून जागेवरच सोडून देण्यात आले होते.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1397159857489268737?s=19
जप्त केलेल्या वाहनांचे राखण करणे जिकिरीचे काम असल्याने पोलिस प्रशासनाने आता ती वाहने सोडण्याचा निर्णय घेतला. वाहनधारकांनी संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन आपापली वाहने दंड भरून घेऊन जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.