Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आषाढी वारीसाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी, 20 बसमधून येणार मानाच्या 10 पालख्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

आषाढी वारीसाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी, 20 बसमधून येणार मानाच्या 10 पालख्या

Surajya Digital
Last updated: 2021/06/11 at 2:38 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पुणे : आषाढी वारीसाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. तसेच देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. शिवाय उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येक 50 वारकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. यंदा 10 पालख्यांसाठी 20 बस देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

अजित पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीची पायी वारी काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. पंढरपूरला यंदाही बसमधूनच पालखी सोहळा नेण्यात येणार आहे. यामध्ये राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत. त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात येणार आहे. तसा निर्णयच कॅबिनेटमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा, आषाढी वारीसाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी #surajyadigital #उपमुख्यमंत्री #आषाढी #वारी #import #Pawar #पालख्या #सुराज्यडिजिटल #अजितपवार pic.twitter.com/jTyg5yPqMM

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांची एक बैठक झाली असून त्यांनी राज्य सरकारला अहवाल दिला आहे. त्यानंतर काल राज्याची कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यात आषाढी वारीसाठी महत्त्वाच्या मानाच्या सर्व दहा पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असं पवार म्हणाले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आषाढी वारी पालखी सोहळ्यातील 10 मानाच्या प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते म्हणााले की, देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार आहे. तर उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना वारीची मुभा देण्यात येणार आहे.

अलर्ट! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस धोक्याचे https://t.co/0nZ01DthND

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021

रिंगण आणि रथोत्सावाला केवळ 15 वारकऱ्यांना परवानगी राहणार आहे. तसेच वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. देहू आणि आळंदी येथून 100 वारकऱ्यांना परवानगी दिली जाईल. तर 10 बसमधून 20 पालख्या नेण्यात येणार आहेत. या सोहळ्यात कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

 

यावेळी ते म्हणाले की, आषाढीच्या पायी वारीसाठी वारकरी संप्रदायानं मागणी केली होती. त्याबाबत वारकरी संप्रदायातील प्रमखांची बैठकही झाली. त्यानंतर गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आषाढी वारी पालखी सोहळ्यातील 10 मानाच्या प्रमुख पालख्यांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाचे श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे प्रशासक ॲड. भाऊसाहेब गंभीरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Permission #10Important #palanquins #AshadiWari #20buses #10palanquins, #आषाढीवारीसाठी #महत्त्वाच्या #पालख्यांना #परवानगी #20बसमधून #10पालख्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अलर्ट! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस धोक्याचे
Next Article शिवसेनेला पाठिंबा दिला तेव्हा कुठे गेली होती विचारधारा ?

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?