Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रायगडमध्ये गावावर दरड कोसळली, 36 जणांचा मृत्यू, 80 जखमी, अनेक बेपत्ता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

रायगडमध्ये गावावर दरड कोसळली, 36 जणांचा मृत्यू, 80 जखमी, अनेक बेपत्ता

Surajya Digital
Last updated: 2021/07/23 at 2:56 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळई गावात दरड कोसळली आहे. यामध्ये जवळपास 32 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर आणखी एका ठिकाणी दरड कोसळल्याने 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या 2 दिवसांपासून या भागात पाऊस होत आहे.

कोकणातील विविध भागात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. यातून अनेक दुर्घटना घडत आहेत. काही ठिकाणी पूल कोसळले आहेत, तर काही ठिकाणी पुराच्या पाण्यात लोक वाहून गेल्याच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. त्यातच आता महाडमध्ये तब्बल 30 घरे ढिगाऱ्याखाली मातीमोल झाले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.

महाडमधील दुर्घटनेबाबत माहिती मिळताच प्रशासनाकडून मदतकार्याच्या हालचालीना वेग आला आहे. मात्र पुराच्या पाण्यामुळे घटनास्थळी मदत पोहोचवण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणीही आलेलं नाही, अशी तक्रार तेथील ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे जखमींवर त्वरित उपचार करावा, अशी मदतीची याचना स्थानिकाकडून होत आहे.

महाड येथील पूर परिस्थितीबाबत आज शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून माहिती घेतली आहे. महाडमधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला बचाव पथके आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झाली आहे. मात्र अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंचावर गेल्यास हेलिकॉप्टरमधील बचाव पथकाला ते दिसतील, त्यामुळे छतावर जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली.

कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड तसेच कोकणपट्ट्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. येथे पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चिपळूणसारख्या ठिकाणी तर घरांत पाणी घुसले आहे. चिपळूनच्या रस्त्यावर तब्बल 10-10 फूट पाणी साचले आहे. या पूरस्थितीमध्ये अनेक नागरिक त्यांच्या घरात अडकून पडले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी, बचाव करण्यासाठी बचावपथकं तैनात केली आहेत. या घरामधील एकूण 72 लोक या कोसळलेल्या दरडीखाली दबले गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

राज्यातील सांगली, रायगड, रत्नागिरी , कोल्हापूर भागांमध्ये पावसाने दाणादाण उडवली आहे. रायगड जिल्ह्यातही पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. तुफान पावसामुळे 32 घरांवर दरड कोसळली असून 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. या भीषण दुर्घटनेनंतर NDRF कडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये पाऊस सुरु आहे. या पावसामुळे तेथे दाणादाण उडाली आहे. काल गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 32 ते 35 घरे दबली गेल्याचे वृत्त आहे. घरांची निश्चित संख्या आणखी अधिकृत कळू शकली नाही. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 32 जणांचे मृतदेह बाजूला काढले. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे.

“एवढी मोठी दुर्घटना घडूनही प्रशासन संवेदनशील नाही. सरकार भावनाशून्य झालंय. शासनाच्या ही अशी निगरगट्ट यंत्रणा मी माझ्या आयुष्यात पाहिलेली नाही, माझी शासनाकडे विनंती आहे की या घटनेकडे गांभीर्याने बघून त्वरित मदत कार्य सुरू करा”

प्रवीण दरेकर – विरोधी पक्ष नेते,
विधान परिषद

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Raigad #36people #killed #80injured #landslide, #रायगड #गावावर #दरडकोसळली #36जणांचा #मृत्यू #80जखमी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पेट्रोल-डिझेलअभावी फॉगिंग मशीन धूळखात पडून 
Next Article मेहुणी शमिता शेट्टीसोबतही राज कुंद्रा करणार होता चित्रपट, घेतले अनेक अभिनेत्रींची नावे

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?