Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: काँग्रेस भवन परिसरातून पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना घेतलं ताब्यात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

काँग्रेस भवन परिसरातून पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना घेतलं ताब्यात

Surajya Digital
Last updated: 2021/11/03 at 7:15 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : काँग्रेसभवन समोर गेल्या काही दिवसापासून उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांना आज सकाळीच शहर पोलीसांनी तेथून हुस्कावून लावत काही जणांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान आम्हाला येथून हुस्कावलं, अटक केली तरी सुटकेनंतर आम्ही पुन्हा जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर आंदोलन करु असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

अक्कलकोट तालुक्यातील मातोश्री साखर कारखान्याने थकवलेले ऊसबिल द्यावे, या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी काँग्रेस भवनसमोर ठिय्या मारला आहे. तुळजापूर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे नेते अरविंद घोडके यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनच्या प्रवेशद्वारावर सलग सहा दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे.

आज बुधवारी दुपारी शेतकऱ्यांचे अटकेचे वृत्त समजल्यानंतर तुळजापूरातून आणखी काही शेतकरी सोलापुरात काँग्रेस भवन परिसरात दाखल झाले आहेत. काँग्रेस भवन येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अक्कलकोट तालुक्यातील रुद्रवाडी येथे असलेल्या मातोश्री साखर कारखान्याकडील शेतकऱ्यांची गेल्या वर्षीची उस गाळप बिलं अद्याप मिळालेली नाहीत. ही बिलं त्वरीत मिळावीत यासाठी हे आंदोलन सुरु आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्याशी संबंधीत हा साखर कारखाना असल्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काँग्रेस भवन येथेच आंदोलन सुरु केलं होतं.

या उपोषणात जवळपास महिला व पुरुष असे शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत. काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासंबंधी अक्कलकोट तालुक्यात मातोश्री साखर कारखाना आहे. या कारखान्याने मागील गळीत हंगामात तुळजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी नेला आहे.

पण एक रुपयाही ऊसबिल न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला. पण बिल देण्याबाबत आश्वासन देण्यात आले नाही, त्यामुळे आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

सलग नऊ दिवस शेतकऱ्यांचे सोलापुरातील काँग्रेस भवन येथे आंदोलन सुरु होते. या शेतकरी आंदोलनाकडे कोणी लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकरी हत्येच्या विषयावर महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद ठेवून निषेध व्यक्त केला. भाजप प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस भवनच्या प्रवेशद्वारात जावून आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. पण शेतकऱ्यांची मागणी मात्र ‘जैसे थे’ असल्याचे चित्र आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Police #riot #stormed #rally #removing #protesters #truck, #काँग्रेसभवन #परिसर #पोलिस #आंदोलक #शेतकऱ्यांना #ताब्यात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article चुकलेली संघ निवड, फसलेली रणनीती, भारतीय संघावर नामुष्की
Next Article वैरागमध्ये व्यापार्‍यांना मारुन दहशत माजविणार्‍यांविरोधात गुन्हा दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?