Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यभरात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

राज्यभरात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Surajya Digital
Last updated: 2021/11/07 at 2:29 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : ऐन दिवाळीत पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, नाशिकसह अनेक ठिकाणी काल पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांना झोडपून काढले. या पावसामुळे भात शेती, वरी, भाजीपाला, टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले. सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी आणि डोळ्यातही पाणी असे विदारक चित्र दिसले.

सांगली जिल्हासह शहरी भागांमध्ये २ नोव्हेंबर रोजी सुमारे एक तास पासून मुसळधार पाऊस सुरू होता. या पडणाऱ्या पावसामुळे शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. या अवकाळी पावसामुळे शेती पिकाला मोठा फटका बसणार आहे.तासभरापासून पडणाऱ्या पावसामुळे बाजारपेठांमध्ये दिवाळीनिमित्त खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.

दिवाळीला सायंकाळीही पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्‍वर, रत्नागिरीसह लांजा तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. रत्नागिरी, चिपळूणात तासभर कोसळलेल्या पावसामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. चिपळूणात सुमारे अर्धा तास कोसळलेल्या पावसामुळे भात कापणी करणाऱ्‍या बळीराजाला फटका बसला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कापणीनंतर सुकवण्यासाठी ठेवलेले भातही भिजले. तालुक्यात अनेक ठिकाणी दिवाळीपूर्व भात कापणीला सुरवात झाली. कापलेल्या भाताची उडवी रचलेली आहे. दिवाळी संपल्यानंतर भात झोडणी केली जाणार आहे. तत्पूर्वी पाऊस पडल्यानंतर कापलेला भातावर पाणी पडले आहे.

चिपळूण शहरासह सावर्डे, अलोरे, पोफळी, खेर्डी, शिरगाव, मार्गताम्हाने, पेढांबे, दसपटी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. पुढील काही दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात सायंकाळी पाच वाजता मुसळधार पावसाला सुरवात झाली. ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत होता.

राज्यात ऐन दिवाळीत पुन्हा एकदा मान्सून हजेरी लावण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या आठ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरीत भागात अद्याप तरी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. उद्यापासून पुढील चार दिवस पुण्यात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकर्‍यांना चांगल्या पिकाची अपेक्षा होती. मात्र, अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचा तोंडचा घास हिरावला आहे.

You Might Also Like

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट

TAGGED: #Presence #unseasonal #rains #across #state #loss #farmers, #राज्यभरात #अवकाळी #पावसाची #हजेरी #शेतकऱ्यांचे #नुकसान
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाविकास आघाडीच्या चर्चेने फराळ कार्यक्रमात रंगत; चेतन नरोटे का चिडले ?
Next Article राज्य किशोर खो – खो निवड चाचणीसाठी सोलापूरचे १० खेळाडू

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?