Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कालच्या हिंसाचारप्रकरणी अमरावतीमध्ये आज जमावबंदीचे आदेश
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

कालच्या हिंसाचारप्रकरणी अमरावतीमध्ये आज जमावबंदीचे आदेश

Surajya Digital
Last updated: 2021/11/13 at 5:54 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अमरावती : त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनांचा निषेध करण्यासाठी काढलेल्या मोर्चात शुक्रवारी हिंसाचार झाला. त्यानंतर आज शनिवारी भाजपने अमरावती बंदचे आवाहन केले होते. यावेळी मोठ्या संख्येने जमाव एकत्र आला. यानंतर प्रशासनाने अमरावतीमध्ये 144 कलम लागू केले आहे.

जमावबंदीचे आदेश मोडणाऱ्यांवर आणि सोशल मीडियावरून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील इतवारा भागात आंदोलकांनी काही गाड्यांची तोडफोड केली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता.

नवरात्र उत्सवादरम्यान बांगलादेशात हिंदुंचे शिरकाण करण्यात आले होते. या घटनेच्या निषेधात त्रिपुरा येथे मोर्चा काढण्यात आला. त्रिपुरातील मोर्चावरून सोशल मिडीयावर अफवा आणि बनावटी मॅसेज फिरवण्यात आले. त्यातूनच हा प्रकार घडला. अमरावती येथे शुक्रवारी घडलेल्या घटनांच्या विरोधात आयोजित मोर्चादरम्यान शनिवारी शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शहरातील राजकमल चौक, नमुना गल्ली, अंबापेठ या भागात दुकाने व वाहनांची जाळपोळ, तोडफोड झाल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला.

आज शनिवारी सकाळपासूनच कार्यकर्ते राजकमल चौकात दाखल झाले. राजकमल चौकातील मुख्य बाजारपेठ बंद करीत मुस्लिम बहुल परिसर असलेल्या इतवारा भागात आंदोलन कर्त्यांनी मोर्चा वळविला. या परिसरात काही गाड्यांची तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दुकाने बंद करावेत, अशी मागणी आंदोलकांकडून केली. आंदाेलकांच्‍या हातात काठ्या असून जोरदार घोषणाबाजी करीत काही गाड्या व दुकानांना लक्ष्य केल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी जमावाला पांगविण्‍यासाठी लाठीचार्ज केला. शहरातील परिस्‍थिती नियंत्रणात आणण्‍यासाठी जिल्‍ह्यातील वरिष्‍ठ पोलिस अधिकारी शहरात दाखल झाले आहेत.

“शहरात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला आहे. याबाबत राज्य सरकार योग्य ती कारवाई करेलच मात्र या घटनेचा काही घटक राजकारणासाठी करत आहेत. जनतेने अशा राजकारणाला बळी पडू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. शांतता राखावी.”

ॲड. यशोमती ठाकूर – पालकमंत्री

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #yesterda #violence #Order #curfew #Amravati, #हिंसाचारप्रकरणी #अमरावती #जमावबंदी #आदेश
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘कंगनाचे विधान चुकीचेचं पण मोदी सरकारविषयी तिचे वक्तव्य बरोबर ‘
Next Article 1947 मध्ये कोणते युद्ध झाले होते, मला सांगा, पद्मश्री परत करणार; मात्र, जे चोर आहेत, त्यांची जळणारच

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?