Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आम्ही महिला पंतप्रधानांसाठी तयार आहोत – ऋचा चढ्ढा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsटॉलीवुडराजकारण

आम्ही महिला पंतप्रधानांसाठी तयार आहोत – ऋचा चढ्ढा

Surajya Digital
Last updated: 2021/12/02 at 8:59 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या विविध राज्यातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सक्षम पर्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी काही कलाकारांशीही चर्चा केली. त्यावर अभिनेत्री ऋचा चढ्ढाने आनंद व्यक्त केला आहे. तसेच आम्ही एका महिला पंतप्रधानासाठी तयार आहोत, असेही ऋचाने म्हटले आहे. दरम्यान भाजप सरकारवर ऋचाने टीका केली आहे.

दरम्यान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबईत असताना ममतांना भेटायला नेहमी भाजपविरोधी वक्तव्ये करणारी अभिनेत्री स्वरा भास्कर मुंबईत आली आहे. स्वरा भास्करने ममतांची भेट घेतल्यानंतर त्यांची स्तुतीही केली आहे. यामुळे स्वरा भास्कर तृणमुल काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

ममता बॅनर्जींनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये त्यांनी सिव्हिल सोसायटीमधील सदस्यांशी संवाद साधला. ममता बॅनर्जी यांनी या कलाकारांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आर्यन खानची अटक या प्रकरणावरून भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शाहरुख खानचा विनाकारण राजकीय बळी देण्यात आला, असे मत त्यांनी आर्यन खानच्या प्रकरणात दिले आहे. भाजपाला क्रूर आणि अलोकतांत्रिक पक्ष देखील त्यांनी यावेळी म्हटले आहे. दिग्दर्शक महेश भट्ट यांनादेखील जाणूनबुजून टार्गेट करण्यात आले होते, शाहरुख खानलाही त्रास देण्यात आला होता. जर आपल्याला जिंकायचे असेल तर आपल्याला लढलं पाहिजे. आणि बोललं पाहिजे. म्हणून आम्हाला राजकीय पक्ष म्हणून मार्गदर्शन करा आणि सल्ला द्या असे त्यांनी उपस्थित कलाकारांसोबत बोलताना म्हटले आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबतच चित्रपट सृष्टीमधूनही मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते. चित्रपटसृष्टीतील जावेद अख्तर, स्वरा भास्कर, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, रिचा चड्डा यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमादरम्यान बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि रिचा चड्डा यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

या कार्यक्रमा दरम्यान ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातील लेखक, विचारवंत, पत्रकार, कलाकार, बुद्धिजीवी अशा लोकांसोबत संवाद साधला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री स्वरा भास्कर, अभिनेत्री रिचा चढ्ढा, पत्रकार राजू परुळेकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी अशी अनेक मंडळी उपस्थित होती. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

You Might Also Like

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

उबाठाच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

TAGGED: #ready #woman #PrimeMinister #RichaChadha, #महिला #पंतप्रधान #तयार #ऋचाचढ्ढा #ममतादीदी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात भाजपने मुंबईत पोलिसात केली तक्रार
Next Article वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांचे निलंबन मागे

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?