Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ओमिक्रॉनच्या नावाने लोकांना सरकारने घाबरवू नये – दरेकर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

ओमिक्रॉनच्या नावाने लोकांना सरकारने घाबरवू नये – दरेकर

Surajya Digital
Last updated: 2021/12/07 at 5:47 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : कोरोनाकाळात गैरव्यवहारांना मोकळीक देणाऱ्या सरकारने लोकांना दोन वर्षे लॉकडाऊन सहन करायला लावला. पण आता ओमिक्रॉनच्या नावाने लोकांना सरकारने घाबरवू नये. लोक लॉकडाऊनच्या मानसिकतेत नसल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोलापुरात म्हटले आहे.

दरेकर हे एका लग्ना समारंभासाठी आज (मंगळवारी) सोलापुरात आले होते. ते शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते.

प्रवीण दरेकर म्हणाले, देवेंद्र फडणवीसांवर असे शंभर खटले टाका, महाराष्ट्र राज्यामध्ये पाच वर्ष निष्कलंक कारकीर्द कुठलाही मुख्यमंत्री आत्तापर्यंत करू शकला नाही. त्यामुळे आत्तापर्यंत एक रुपयाचा डागही त्यांच्या चारित्र्यावर लागलेला नाही. या सर्वांचे उत्तर न्यायालय योग्यवेळी देईलच, त्यामुळे अशा खटल्यांना आम्ही भीक घालत नाही, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.

मोफत वीज, सवलतीत वीज या घोषणा तर हवेतच पण महाविकास आघाडी सरकारने बीलासाठी वीज तोडल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून तातडीने वीज नाही जोडली तर उग्र आंदोलन करू आणि उद्रेकाला सरकारच जबाबदार असेल, असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला.

सरकारने राज्यात एक इंचही विकास केला नाही. महाराष्ट्र २५ वर्षे मागे गेला आहे. उलट फडणवीस सरकारने सुरु केलेली विकास कामे रद्द करणे अथवा त्यांना निधी न देण्याचे काम हे सरकार करीत आहे. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देणाऱ्या ठाकरे सरकारचे शेतकरी प्रेम हे पुतना मावशीचे असल्याचाही टोला दरेकर यांनी लगावला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सरकारमध्ये असणारा विसंवाद हा प्रशासनामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे राज्याचा विकास एक इंचही पुढे जात नाही, त्यामुळे आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. तीन पक्षांचे हे सरकार आपापल्यातील विसंवाद आणि आंतरिक विरोधातून शंभर टक्के कोसळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना युपीएत सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यावर प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘शिवसेना या अगोदरच काँग्रेसबरोबर गेली. आता ती युपीएत गेली तर काही मोठा फरक पडणार नाही. सत्तेसाठी काँग्रेस – राष्ट्रवादीला भागीदार बनवणाऱ्या शिवसेनेने हिंदुत्व आणि मराठी माणसाला तिलांजली दिली, असंही प्रवीण दरेकरांनी म्हटंल आहे.

* शिवसेना गांधी घराण्याभोवती पिंगा घालतंय

दरेकर म्हणाले, कॉंग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेनेचा केंद्रबिंदू बदलला आहे. अगोदर शिवसेनेचा केंद्रबिंदू हा बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व होतं, मात्र आता शिवसेनेचा केंद्रबिंदू हे गांधी घराणं झालेला आहे, त्यामुळे शिवसेना आता गांधी घराण्याभोवती पिंगा घालताना दिसून येत आहे.

शिवसेना या अगोदरच कॉंग्रेसबरोबर गेलीय, आता ती यूपीएत गेली तर काही मोठा फरक पडणार नाहीये. सत्तेसाठी कॉंग्रेस – राष्ट्रवादीला भागीदार बनवणाऱ्या शिवसेनेने हिंदुत्व आणि मराठी माणसाला तिलांजली दिलीय. महाविकास आघाडी सरकार हे दीर्घकाळ टिकू शकत नाही.

* संभाजी ब्रिगेडच्या कृतीचे समर्थन

अखिल भारतीय साहित्य संम्मेलनात ज्येष्ठ संपादक गिरीष कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या प्रकारावरही दरेकर यांनी मोजक्या शब्दात भाष्य केलं. विचारवंत, पत्रकार, लेखकांच्या लेखणीने समाजाला दिशा मिळत असते. त्यामुळे त्यांनी लोकभावनेचा आदर केला पाहिजे.

जर अशा लोकांनी बेमालुमपणे समाजाच्या भावना बिघडवल्या, श्रद्धास्थानांवर लिहिलंत तर ऍक्शनला रिऍक्शन मिळणारच. त्यामुळे गिरीश कुबेरांवरील शाई हल्ला ही ऍक्शनला रिऍक्शन होती, अशा स्वरूपात ती करायला नको होती, मात्र ती ऍक्शनला आलेली रिऍक्शन होती, असं म्हणतं प्रवीण दरेकरांनी संभाजी ब्रिगेडने केलेल्या कृतीचं समर्थन केलं आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #Governmen #not #intimidate #people #Omicron #Darekar, #ओमायक्रॉन #नावाने #लोक #सरकार #घाबर #प्रवीणदरेकर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article घरजागा वाटून देण्यासाठी वृध्द आईवर कोयत्याने वार; ऊसतोड कामगार महिलेचा मृत्यू
Next Article नानांना यंदाचा गदिमा तर गृहिणी सखी सचिव पुरस्कार निवेदिता सराफांना जाहीर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?