अहमदनगर : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास होऊन त्याला न्याय मिळावा ही सर्वांची इच्छा आहे. मात्र या प्रकरणात भाजपा राजकारण करत असल्याने सुशांतला कदाचित न्याय मिळणारं नाही, अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावर भाजपा नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्र सरकारवर आरोप करत सुशांत सिंहची आत्महत्या ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गौफ्यस्फोट केला होता. तर या प्रकरणामध्ये गलिच्छ राजकारण होतं असल्याची प्रतिक्रिया राज्य सरकारचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली होती. तर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वास्तविक पाहता बिहारच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि त्यामुळेच सुशांत सिंह प्रकरणाला राजकीय वळण देण्यात येत आहे. परंतू जर या प्रकरणात राजकारण केल्यास कदाचित सुशांतला न्याय मिळणारं नाही, बिहार मधून महाराष्ट्रात आलेल्या अनेकांसोबत अशा घटना घडल्या आहे मात्र त्याची कधी इतकी चर्चा झाली नाही. मात्र या प्रकरणाची खूप चर्चा होतं आहे.
भाजपा नेते राज्य सरकार व मुंबई पोलिसांवर आरोप करत आहेत. वास्तविक जर त्यांच्याकडे सुशांत सिंह प्रकरणाचे पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे पोलिसांना द्यायला हवे. मात्र भाजपा तसं न करता फक्त शब्दांचा खेळ करून जनतेची दिशाभूल करत आहे. राज्यावर अनेक संकट येवून गेली त्यावेळी मुंबई पोलिसांनीच सर्व प्रकरणे सक्षमपणे हाताळली आहे. त्यामुळे भाजपाचे आरोप हे फक्त जूमले असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.