Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी दिलं उत्तर; बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी दिलं उत्तर; बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का?

Surajya Digital
Last updated: 2022/01/24 at 6:42 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

मुंबई : 25 वर्ष आम्ही युतीत सडलो असं शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरेंनी Shiv Sena chief Uddhav Thackeray म्हटलं होतं. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ’25 वर्ष आम्ही युतीत सडलो असं ते म्हणाले. पण 2012 पर्यंत या युतीचे नेते हे स्वत: वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का?, असं फडणवीस म्हणाले.

भाजपासोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवलं का? असा विचार आमच्या मनात येत आहे असं फडणवीस म्हणाले. राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केले आहे. “माझा चेहरा वापरला असे महादेव जानकर आणि विनायक मेटेसुद्धा म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंचाही चेहरा वापरला होता. त्यावेळी सगळे युतीमध्ये होते म्हणून सगळ्याचेच फोटो वापरले होते,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“तुमचे हिंदुत्व कागदावरचे आहे. हिंदुत्व बोलून चालत नाही, ते जगावे लागते. नरेंद्र मोदींनी narendra modi राम मंदिर ram mandhir, काशी विश्वनाथ, ३७० असे निर्णय घेतले. ३७० वर तुमची तर संदिग्ध भूमिका होती. १९९३ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेने १८० उमेदवार उभे केले, त्यापैकी १७९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. १९९६ साली २४ पैकी २३ जागी आणि २००२ सालच्या निवडणुकीत ३९ पैकी ३९ जागी शिवसेनेचे डिपॉझिट जप्त झाले होते. म्हणे त्यावेळी लाट होती, कशाला खोटे बोलता?,” असाही सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

“आठवण करुन देतो की तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत mumbai आमचा नगरसेवक होता, आमदार होते. १९८४ मध्ये लोकसभेची निवडणूक election तुम्ही भाजपाच्या चिन्हावर लढवली होती शिवसेनेच्या नाही. मनोहर जोशी manohar joshi जे नंतर मुख्यमंत्री झाले ते भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढले होते,” अशी आठवण यावेळी फडणवीसांनी करुन दिली. Fadnavis answers Uddhav Thackeray; Are you pointing fingers at Balasaheb’s decision?

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

हे भाजपासोबत सडले असं सांगातत. पण भाजपासोबत असताना पहिल्या क्रमांकाचे आणि सोडल्यानंतर चौथ्या क्रमांकाचा पक्ष The fourth party  झाले. त्यामुळे कोणासोबत सडले याचाही निर्णय घेतला पाहिजे,” असा टोला यावेळी फडणवीसांनी लगावला.

“आरएसएस RSS, धर्मवीर आनंद दिघेंनी संघर्ष केला. पण जेव्हा तुमचे मुख्यमंत्री CM होते तेव्हाही तुम्ही सोडवला नाही आणि आजही तुम्ही सोडवला नाही. त्यामुळे तुमचं हिंदुत्व कागदावरचं, भाषणातलं आहे. तुम्ही औरंगाबादचं संभाजीनगर Sambhajinagar of Aurangabad करु शकले नाही, उस्मानाबादचे धाराशीव Dharashiv of Osmanabad करु शकले नाही. पण तिथे अलाहाबादचं प्रयागराज Prayagraj of Allahabad झालं, त्यांनी ते करुन दाखवलं. तुम्ही फक्त बोलत राहिलात. हिंदुत्व जगावं लागतं, ते फक्त भाषणापुरतं मर्यादित नसतं. मोदींनी ते करुन दाखवलं आहे”.

आम्ही तर वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना Venerable Balasaheb Thackeray अभिमानाने अभिवादन करतो. पण अभिवादन सोडा, त्यांच्यासाठी एक ट्वीट सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींकडून Sonia Gandhi, Rahul Gandhi and Priyanka Gandhi करुन दाखवा. याला लाचारी म्हणतात. ज्यावेळी तुम्ही त्यांच्या फोटोंना हार घालता आणि त्यांना मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला ट्वीट करायलाही लाज वाटते. तरी सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसता. यापेक्षा मोठी लाचारी काय?,” अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री

महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी

TAGGED: #Fadnavis #answers #UddhavThackeray #Balasaheb's #decision, #उद्धवठाकरे #फडणवीस #उत्तर #बाळासाहेब #निर्णय #बोट #राजकारण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘तुझे बाबा आम्हाला भेटत नाहीत, त्यामुळेच राज्यपालांना भेटावे लागते’
Next Article शरद पवार यांना कोरोनाची लागण, पीएम मोदींसह अनेक नेत्यांचे फोन

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?