Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ – भाऊ; सध्या मोठ्या परिवर्तनाची गरज – के. चंद्रशेखर राव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ – भाऊ; सध्या मोठ्या परिवर्तनाची गरज – के. चंद्रशेखर राव

Surajya Digital
Last updated: 2022/02/20 at 6:41 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

मुंबई : देशातील राजकारण आणि विकास कामांच्या विविध मुद्यांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यावरून देशात मोठ्या परिवर्तनाची गरज आहे, यावर आमच्यात सहमती झाली असल्याची माहिती तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिली. चंद्रशेखर राव यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव यांना हैदराबादला येण्याचे आमंत्रण देणार असल्याचं ते म्हणाले.

देशातील राजकारण आणि विकास कामांच्या विविध मुद्यांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. देशात मोठ्या परिवर्तनाची गरज आहे, यावर आमच्यात सहमती झाली असल्याची माहिती तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले. याबरोबरच महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ असल्याचे के. चंद्रशेखर राव यावेळी म्हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि के. चंद्रशेखर राव यांच्यात आज बैठक झाली. या बेठकीनंतर चेंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि नरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

Maharashtra and Telangana brothers – brothers; Right now a big change is needed – K. Chandrasekhar Rao

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

चंद्रशेखर राव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेवरच आम्ही चालत आहोत. महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ आहेत. दोन्ही राज्यांमध्ये हजार किलोमीटरचे अंतर असले तरी दोन्ही राज्यात चांगले संबंध आहेत. आम्ही आणखी काही पक्षांच्या नेत्यांसोबत देशातील परिस्थीतवर चर्चा करणार आहे. महाराष्ट्रातून जी सुरू गोष्ट होते, ती पुढे खूप मोठी होते. लोकशाहीसाठी आम्ही लढणार आहोत. याची सुरूवात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सुरू केली आहे. जाच्या भेटीचे पुढील काळात चांगले परिणाम दिसतील अशी आशा चंद्रशेखर रावा यांनी यावेळी व्यक्त केली.

के. चंद्रशेखर राव म्हणाले, “भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत देशातील परिस्थीवर बोलण्यासाठी मी महाराष्ट्रात आलो आहे. त्यावरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांना भेटून खूप आनंद झाला. देशाच्या विकासाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांना हैदराबादला येण्याचे आमंत्रण देणार आहे. तेथे आम्ही एकत्र भेटून देशातील राजकारणावर आणखी चर्चा करणार आहोत.”

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव सायंकाळी सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी जावून शरद पवारांची भेट घेणार आहेत. दरम्यान, केंद्रातील भाजप सरकारविरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्याचे संकेत नुकतेच केसीआर यांनी दिले होते. यावर बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, चंद्रशेखर राव यांना सगळ्यांना भेटण्याचा अधिकार आहे. त्यांचे काम हे तेलंगणापर्यंत मर्यादित आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जी भूमिका मांडायची आहे ती मांडू द्या. ते भेटले तर चांगलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पण भेटले पाहिजे. राव यांचे काम हे तेलंगणापर्यंत मर्यादित आहे. तिसरी आघाडी जरी झाली तरी आम्हाला फरक पडणार नसल्याचे म्हटले.

■ सुडाचं राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यात मुंबईत वर्षा बंगल्यावर दीड तास भेट झाली. या भेटीनंतर दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्यातील सदिच्छा भेट होती, त्यात काही लपवण्यासारखे नाही. तसेच सूडाचे राजकारण हे आमचं हिंदुत्व नाही. देशात परिवर्तन होण्याची गरज आहे. परिवर्तनाच्या मुद्द्यावर आमचे एकमत झाले आहे, असं ते म्हणाले.

 

You Might Also Like

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता

मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर

छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा

दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी

अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे

TAGGED: #Maharashtra #Telangana #brothers #Right #bigchange #needed #KChandrasekharRao, #महाराष्ट्र #तेलंगणा #भाऊ #परिवर्तन #गरज #केचंद्रशेखरराव #ठाकरे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुप्रीम कोर्टाचा ऑर्केस्ट्राबारवरून ठाकरे सरकारला दणका
Next Article चुकीचा पोलिओ डोस पाजल्यामुळे दोन महिन्याच्या बालिकेचा मृत्यू

Latest News

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी
महाराष्ट्र May 8, 2025
अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?