Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारतीय टीम बनली नंबर वन; रोहित भारताचा यशस्वी कर्णधार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsखेळ

भारतीय टीम बनली नंबर वन; रोहित भारताचा यशस्वी कर्णधार

Surajya Digital
Last updated: 2022/02/22 at 8:39 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली : भारताने वेस्ट इंडिजला वनडे आणि टी-२० मालिकेत धूळ चारली. यासह भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या मालिकेत निर्भेळ यश मिळवले आहे. भारताचा कर्णधार म्हणून पहिल्या २५ ट्वेंटी- २० सामन्यांत रोहित शर्माने सर्वाधिक २१ विजयांची नोंद केली आहे. तसेच घरच्या मैदानावर सर्वाधिक ट्वेंटी- २० सामने जिंकणारा रोहित हा भारताचा यशस्वी कर्णधार ठरला आहे. शिवाय भारताने टी-२० क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला.

भारतीय संघाने घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेपाठोपाठ टी – २०तही पाहुण्या वेस्ट इंडिजला ३-० ने क्लीन स्वीप दिला. या मालिका विजयासोबतच भारताने टी-२० क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर मजल मारली आहे. जवळपास सहा वर्षांनंतर हे घडले आहे, जेव्हा टीम इंडियाला टी-२० मध्ये नंबर वन स्थान मिळाले आहे.

यापूर्वी, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला २०१६ मध्ये शेवटच्या वेळी हे स्थान मिळवता आले होते. याआधी भारतीय संघ १२ फेब्रुवारी २०१६ ते ३ मे २०१६ या कालावधीत टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी संघाचा कर्णधार होता, त्यानंतर कर्णधारपद विराट कोहलीच्या हातात आले. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दीर्घकाळ कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला, मात्र टी-२० मध्ये त्याने हा मुकुट मिळाला नाही. The Indian team became number one; Rohit is a successful captain of India

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

भारताच्या खात्यात २६९ रेटिंग गुण झाले आहेत. तर इंग्लंडचेही २६९ रेटिंग गुण आहेत. मात्र त्यांचे एकूण गुण हे १०,४८४ तर इंग्लंडचे एकूण गुण १०,४७४ असल्याने त्यांची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
त्यांच्यापाठोपाठ पाकिस्तान (२६६) तिसऱ्या, न्यूझीलंड(२५५) चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका (२५३) पाचव्या स्थानी आहे.

ऑस्ट्रेलियाने नुकतीच श्रीलंकेविरुद्धची मालिका ४-१ अशा फरकाने जिंकल्याने ते २४९ रेटिंग गुणासह सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर अनुक्रमे वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशचा नंबर लागतो.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत रोहित शर्माने पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली, ज्यामध्ये भारताने ३-० असा विजय मिळवला. आता वेस्ट इंडिजविरुद्धची टी-२० मालिकाही भारताने ३-० अशी जिंकली आहे. रोहित शर्मा टी-20 इतिहासातील भारताचा तिसरा सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे.

टी-२० फॉर्मेटमध्‍ये टीम इंडियाने सलग ९ सामने जिंकले आहेत. आता भारतासमोर श्रीलंकेचे आव्‍हान असेल. भारतीय संघ श्रीलंकेविरोधात टी-२० मालिकेत तीन सामने खेळणार आहे. पहिला सामना २४ फेब्रुवारी रोजी कोलकाता येथे होणार असून, २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे दुसरा व तिसरा सामना होणार आहे.

 

You Might Also Like

विराट कोहलीच्या सोशल मीडियावरील पोस्टची क्रिकेट जगतात चर्चा

आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता

शुभमन गिलकडून रोहित आणि विराटवर कौतुकांचा वर्षाव

महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

आशिया कपमध्ये २१ सप्टेंबर रोजी पुन्हा भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला

TAGGED: #Indian #team #numberone #Rohitsharma #successful #captain #t20, #भारतीय #टीम #नंबरवन #रोहितशर्मा #यशस्वी #कर्णधार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उठसुठ विठ्ठल कारखानाच दिसतो का…? जयंत पाटलांनी घेतली हजेरी
Next Article हिजाबचा वाद शांत होत असताना बजरंग दलाच्या हर्षाची हत्या

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?