Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 10 – 12 परीक्षा ऑफलाईनच होणार, दुसरीकडे प्रश्नपत्रिका जळून खाक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

10 – 12 परीक्षा ऑफलाईनच होणार, दुसरीकडे प्रश्नपत्रिका जळून खाक

Surajya Digital
Last updated: 2022/02/23 at 6:42 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अमरावती : दहावी-बारावीची ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असताना दुसरीकडे प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पुणे-नाशिक महामार्गावर एका टेम्पोला अचानक आग लागली. संगमनेरमधील चंदनापुरी घाटात ही घटना घडली. टेम्पोच्या मागच्या बाजूने आग लागली. या आगीमध्ये दहावी आणि बारावीच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे पुणे बोर्डाचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतरच पंचनामा करू अशी माहिती संगमनेर पोलिसांनी दिली.

दहावी-बारावीची ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. देशातील सर्व बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र अशा प्रकारची याचिका दिशाभूल करणारी आणि विद्यार्थ्यांना खोटी आशा दाखवणारी आहे, असे कोर्टाने म्हटले. त्यामुळे आता ठरलेल्या वेळापत्रकानुसार दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. 10 – 12 exams will be held offline, on the other hand, burn the question papers

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

अहमदनगर – नगर-पुणे महामार्गावर चंदनापुरी ( ता. संगमनेर, जि. अहमदनगर ) परिसरात 12वीच्या प्रश्नपत्रिका पुण्याला घेऊन चाललेला एका टॅम्पोला आग लागली. यात बऱ्याचशा प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या तर उर्वरित प्रश्नपत्रिका आग विझविताना खराब झाल्या आहेत.

मध्यप्रदेशातील भोपाळ येथून पुण्याला निघालेला टॅम्पो ( क्रमांक एम 36, एच 0795 ) या चालत्या वाहनाला अचानक आग लागली. ही बाब टॅम्पो चालक मनीष चौरसिया व व्यवस्थापक रामविलास राजपूत यांना समजली. त्यांनी प्रसंगावधान राखत टॅम्पो रस्त्याच्या कडेला घेतला. त्यामुळे कोणतीही जीवित हाणी झाली नाही. आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग विझत नव्हती. स्थानिक नागरिकांनी घारगाव पोलिस ठाणे व महामार्ग पोलिसांना कळविले. त्यानुसार पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले.

अग्निशमन बंबांनी आग विझविली. मात्र यात कागदपत्रे मोठ्या प्रमाणात जळाले. उर्वरित कागद पत्रे खराब झाली. ही कागदपत्रे कशाची आहेत असे पोलिसांनी चौकशी करता वाहन चालकाने पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका असल्याचे सांगितले. पुणे बोर्डातील अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांना घटनास्थळी येण्यास सांगितले. त्यानुसार पुण्यातून बोर्डाचे अधिकारी चंदनापुरी घाटात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुणे बोर्डाचे अधिकारी घटनास्थळी आल्यावर पंचनामा करू अशी माहिती संगमनेर पोलिसांकडून देण्यात आली आहे.

 

 

You Might Also Like

लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन

काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मंत्रालयात अभिवादन

रेल्वे प्रकल्प मंजुरीबद्दल अशोक चव्हाणांचे पंतप्रधानांना आभार

महादेव मुंडे हत्या प्रकरण : 21 महिन्यांनंतरही आरोपी फरार

TAGGED: #exams #held #offline #otherhand #burn #questionpapers, #परीक्षा #ऑफलाईन #दुसरीकडे #प्रश्नपत्रिका #जळून #खाक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article दहावी – बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार
Next Article राष्ट्रवादी : मलिक यांच्या राजीनाम्याची गरज नाही; भाजप : भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम

Latest News

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते
सोलापूर August 1, 2025
मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे
सोलापूर August 1, 2025
सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
सोलापूर August 1, 2025
रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?
देश - विदेश August 1, 2025
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन
महाराष्ट्र August 1, 2025
आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत
देश - विदेश August 1, 2025
काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री
महाराष्ट्र August 1, 2025
“त्यावेळी सरसंघचालकांना पकडण्याचे आदेश होते” – महिबूब मुजावर
सोलापूर August 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?