Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघाला हादरा, काँग्रेस तिसऱ्या स्थानावर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशराजकारण

गांधी घराण्याच्या पारंपरिक मतदारसंघाला हादरा, काँग्रेस तिसऱ्या स्थानावर

Surajya Digital
Last updated: 2022/03/10 at 5:56 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

● प्रियंका गांधींनी लिहले पत्र

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये भाजपने चांगलीच मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे. गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असेलल्या रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. हा काँग्रेससाठी मोठा हादरा मानला जातोय. रायबरेलीतून भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. तर अमेठीत समाजवादी पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहे.

उत्तर प्रदेश मध्ये भारतीय जनता पक्षाने इतर सर्व पक्षांना अक्षरशः मातीत गडायचा प्रयत्न केला आहे. उत्तराखंडमध्ये एकूण 70 जागांपैकी भाजपा 40 तर काँग्रेस फक्त 17 जागांवर आघाडीवर आहे. यामुळे उत्तराखंडमध्ये पुन्हा भगवी लाट येणार यात कोणताही वाद नाही. याच बरोबर गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंड काँग्रेस होईल हा काँग्रेसचा दावा या निकालामुळे उधळून गेला आहे.

गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ असेलल्या रायबरेली आणि अमेठीमध्ये काँग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत. हा काँग्रेससाठी मोठा हादरा मानला जातोय.

उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी हे काँग्रेसचे पारंपारिक मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहेत. तर भाजपचे उमेदवार या ठिकाणाहून आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. रायबरेली मतदारसंघात नुकत्याच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आदिती सिंह 4 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर इथे काँग्रेस उमेदवाराला दुसऱ्या फेरीअखेर फक्त 940 मतं मिळाली आहेत.

भाजप उमेदवाराने याठिकाणी मोठी आघाडी घेतली आहे. बरीच वर्ष आदिती सिंह या राहुल ब्रिगेडचा युवा चेहरा होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या रायबरेलीच्या खासदार आहेत. तर अमेठीत पहिल्या फेरीअखेर समाजवादी पर्टीचे उमेदवार 1 हजार 100 मतांनी आघाडीवर आहे. तिथे काँग्रेस उमेदवाराला फक्त 477 मतं मिळाली आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निराश होऊ नका, आपली लढाई आता सुरु झाली आहे असा संदेश दिला आहे.

Shake the traditional constituency of the Gandhi dynasty, with the Congress in third place

उप्र कांग्रेस के कार्यकर्ताओं, प्रत्याशियों, पदाधिकारियों एवं नेताओं के नाम मेरा संदेश।

जय हिंद
जय कांग्रेस। pic.twitter.com/5hdYsfqIL5

— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) March 9, 2022

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

एग्झिट पोलमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानंतर प्रियंका गांधी यांनी काल ट्विटरवरुन कार्यकर्त्यांच्या नावे एक संदेश दिला.

दरम्यान, देशामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झाले होते. त्याठिकाणी एकूण 403 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे तिथे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

कारण दिल्ली गाठण्याचा मार्ग युपीमधून जातो असे म्हटले जाते. त्यामुळे राजकीयदृष्ट्या यूपी हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. तसेच गोव्यात 40 जागांसाठी एका टप्प्यात, उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यात आणि पंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते.

 

पंजाब लोक काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसपासून फारकत घेऊन त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला होता आणि भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र आम आदमी पक्षाचे उमेदवार अजित पाल सिंग कोहली यांच्याकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

 

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी

रेल्वे प्रवाशांसाठी ‘रेलवन’ सुपर अ‍ॅप लॉंच; सर्व सुविधा आता एका ठिकाणी

ट्रम्प यांनी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ मंजूर केल्यास मस्क नवीन पक्ष करणार स्थापन

राजधानीत वसंतराव नाईक जयंती साजरी

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी

TAGGED: #गांधी #घराण्या #पारंपरिक #मतदारसंघ #हादरा #काँग्रेस #तिसऱ्या #स्थानावर #पत्र
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मोदींची जादू कायम ! पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपचा विजय
Next Article देवेंद्र फडणवीस यांची जादू पुन्हा एकदा गोव्यात दिसली, घेतल्या सुमारे 50 हून अधिक सभा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?