मुंबई/ नवी दिल्ली : ठाकरे सरकारने कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना 3 टक्के अधिक महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा महागाई भत्ता वाढ 1 जुलै 2021 पासूनच्या थकबाकीसह मार्च, 2022 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
मोदी सरकारने कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केली आहे. आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना महागाई भत्ता 34 टक्के मिळणार आहे. मोदी मंत्रीमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा फायदा 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनर्सना होणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना देण्यात येणाऱ्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि कोरोना विषाणू ससंर्गामुळं निर्माण झालेली स्थिती याला सामोरं जाण्यास मदत होणार आहे. केंद्र सरकारनं गेल्या वर्षभरात महागाई भत्त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांकंडून मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं जाण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदी सरकारनं गेल्या वर्षी महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून वाढवून 28 टक्के केला होता. त्यानंतर कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात म्हणजेच ऑक्टोबर 2021 मध्ये महागाई भत्ता आणखी तीन टक्के वाढवण्यात आला त्यामुळं तो 31 टक्क्यांवर पोहोचला होता. आता त्यानंतर आणखी एकदा महागाई भत्ता वाढवून देत केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतन घेणाऱ्यांसाठी केंद्रानं मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनर्सना होणार आहे. Thackeray government, Modi government’s visit (gift) to employees; Inflation allowance increased by 3%
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढवून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे. बुधवारी (ता.30) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. या निर्णयाच्या काही तासांनंतरच महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे.
21 जुलै 2021 पासून हा डीए कर्मचाऱ्यांना लागू होणार असून मार्चच्या पगारामध्ये तो कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 34 टक्के इतका डीए मिळणार आहे. आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील 2022 पासून नवीन महागाई भत्ता प्रमाणे पगार मिळणार आहे.
राज्य शासनाच्या वित्त विभागाने जारी केलेल्या जीआर नुसार एक जुलै 2021 पासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता वाढ देण्यात येणार आहे व मार्च 2022 च्या पगारा सोबत ही फरकाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. शासनाच्या वित्त विभागाने दोन महागाई भत्त्याच्या संदर्भात शासन निर्णय जारी केली असून त्यानुसार जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांची थकबाकी होती ती देण्यात येणार आहे. तसेच या मार्चपासून महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवून 31 टक्के करण्यात आला आहे. या निर्णयाचे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने स्वागत केले आहे.