Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: झोपडपट्ट्यांमधील मदरशांवर धाडी टाका; राज ठाकरेंची मोदींकडे मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

झोपडपट्ट्यांमधील मदरशांवर धाडी टाका; राज ठाकरेंची मोदींकडे मागणी

Surajya Digital
Last updated: 2022/04/02 at 10:30 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

□ मशिदीवरील भोंगे उतरवले नाही, तर त्यांच्यासमोर हनुमान चालिसा लावा

मुंबई : गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मुबंईतील शिवाजी पार्क येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक विनंती केली आहे. ‘तुम्हाला पाकिस्तानची गरज नाही. मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी टाका. यांच्याबाबत पोलिसांना माहिती आहे. या झोपडपट्टीत बऱ्याचशा गोष्टी हाती लागतील,” असे राज ठाकरे म्हणाले.

गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेने जाहीर सभा घेतली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोठे विधान केले.. “मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. माझा प्रार्थनेला विरोध नाही. पण कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्यासमोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.

भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलेले दिसले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राने युतीला कौल दिला होता. पण मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने गद्दारी केली असा हल्लाबोल त्यांनी केला. तर जे ठरलं ते आधीच जनतेसमोर का मांडले नाही? असा सवालही त्यांनी विचारला.

लोक जातीपातीच्या मुद्द्यावर एकमेकांविरोधात उभ रहावेत ही गोष्ट काही लोकांना हवी आहे. महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना एनसीपीला ही गोष्ट हवी आहे. जेव्हा महाराष्ट्रात १९९९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाली, तेव्हापासूनच जातीपातीच राजकारण मोठ्या प्रमाणात राज्यात सुरू झाले, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने शिवतिर्थावर केला.

जातीच्या निमित्ताने महाराष्ट्रात एकमेकांची भडकवायची कामे सुरू झाली. महाराष्ट्रात एकेकाळी जातीचा अभिमान होता. पण जातीत फूट पाडायची सुरूवात ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर झाली. दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे आणि फूट पाडत राहणे याची सुरूवात राष्ट्रवादीने केली.

Raid madrassas in slums; Raj Thackeray’s demand to Modi

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

निवडणुकींच्या तोंडावर पैशाचा चारा टाकायचा आणि सत्ता मिळवायची असाच प्रकार सुरू झाला. आम्ही एकमेकांची डोकी फोडायला तयार झालो आहोत. आम्ही जातीच्या बाहेर जात नाही, कोणता हिंदुत्वाचा ध्वज आपण घेणार आहोत ? हिंदु म्हणून आपण कधी एक होणार आहोत असाही सवाल त्यांनी केला.

उत्तर प्रदेश निकाल पाहिल्यानंतर तिथे विकास होतोय हे दिसले. हेच मलाही पाहिजे होते. जेव्हा २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून सत्तेत आले तेव्हा उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड तीन राज्याचा विकास करा, त्यांना त्यांच्या राज्यात रोजगार मिळुदेत अस मी बोललो होतो. आनंदाची गोष्ट आहे की तिथे चांगल होतय. सगळ्यांच ओझ घ्यायला महाराष्ट्र बसलेला नाही, असाही टोला त्यांनी लगावला.

□ कुटुंबावर गोष्टी येतात तेव्हा आता चिडायची काय गरज आहे ?

मुख्यमंत्री पद महाराष्ट्राच जनतेच आहे. ती गोष्ट चार भिंतीत का केली असाही सवाल राज ठाकरे यांनी सभेत केला. मुख्यमंत्री पदासाठी जे अडीच वर्षाच राजकारण केले समोरची व्यक्तीही आता राजकारण करत आहे हे लक्षात घ्या, असेही राज ठाकरे म्हणाले. जेव्हा कुटुंबावर गोष्टी येतात तेव्हा आता चिडायची काय गरज आहे ? ईडीने मलाही नोटीस पाठवली होती. पण मी गेलोच ना नोटीशीला उत्तर द्यायला. मग यशवंत जाधव यांना चार महिने नोटीस येऊनही ईडी संपत्ती अटॅच करते तेव्हा मुख्यमंत्र्यांना इतक चिडायची काय गरज आहे ? असाही सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या घरच्यांनी पालिकेत जाऊ नये , असाही सल्ला राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

 

□ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करा – राज ठाकरे

14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यासंदर्भात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जयंती उत्साहात साजरी करा, असे आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केले आहे. आपल्या महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या प्रत्येक महापुरुषांची जयंती उत्साहात साजरी व्हावी, असेही ते यावेळी म्हणाले. राज ठाकरे यांनी आज मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात मनसे कार्यकर्त्यांना संबोधित केले.

You Might Also Like

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता

गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण

धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव

धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

टाटा ऑटो कॉम्प सादर करणार रेल्वेसाठी नवीन उत्पादने

TAGGED: #Raid #madrassas #slums #RajThackeray's #demand #Modi, #झोपडपट्ट्या #मदरशा #धाडी #टाका #राजठाकरे #मोदी #मागणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मलायका अरोराच्या कारचा अपघात, रुग्णालयात दाखल
Next Article आता घर घेणे झाले महाग, होमलोनवरील ही सूट बंद

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?