Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शेतकऱ्यांची चिंता वाढली, महाराष्ट्रात 17.5 लाख टन ऊस शिल्लक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रशिवार

शेतकऱ्यांची चिंता वाढली, महाराष्ट्रात 17.5 लाख टन ऊस शिल्लक

Surajya Digital
Last updated: 2022/05/22 at 4:52 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

मुंबई : यंदाचा उसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. हंगाम संपत आला तरी अद्याप राज्यातील काही जिल्ह्यामध्ये ऊस शिल्लक आहे. राज्यात अतिरीक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. महाराष्ट्रात अद्याप 17.5 लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. आमचा ऊस कारखान्याला जाणार की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. Farmers worried, Maharashtra has 17.5 lakh tonnes of sugarcane left

यंदाच्या वर्षी अतिरिक्त ऊस गाळपाचा मोठा प्रश्न निर्मण झाला आहे. हा गाळप हंगाम साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरु होतो. हा हंगाम एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत चालतो. मात्र यंदाच्या वर्षी उसाच्या लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. अद्यापही राज्यातल्या अनेक जिल्ह्यातील ऊस गाळपाविना रानात उभा आहे.

सध्या बीडमध्ये 4 लाख टन,जालना 3.90 लाख टन,अहमदनगर 3 लाख टन, लातूर 2.42 लाख टन, उस्मानाबाद 2.38 लाख टन,
सातारा 1 लाख टन, नांदेड 63 लाख टन, नांदेड येथे 63 लाख टन ऊस शिल्लक आहे. औरंगाबादमध्ये 50,000 टन परभणीत 30,000 टन ऊस शिल्लक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दली आहे.

महाराष्ट्रात अद्याप 17.5 लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. राहिलेल्या या उसाचे गाळप या महिन्याच्या अखेरीस पूर्ण केले जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याचबरोबर 30 हून अधिक साखर कारखाने ऊस संपेपर्यंत कार्यरत राहतील असेही ते म्हणाले. दरम्यान, 2022-23 मध्ये ऊस गाळपाचे नियोजन थोडे लवकर सुरु होईल अशी माहिती त्यांनी दिली.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांपैकी मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. जिथे अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक आहे. गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसानंतर राज्यातील उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. ऊस गाळप हंगाम संपल्यानंतरही राज्यात सुमारे 17.5 लाख टन ऊस गाळप होण्याच्या प्रतीक्षेत आहे. राज्याच्या काही भागात यंदाचा ऊस गाळप हंगाम हा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु राहू शकतो अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

सध्या राज्यभरातील शेतात सध्या सुमारे 17.5 लाख टन उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. यातील बहुतांश ऊस 31 मे पर्यंत गाळप केला जाईल. अहमदनगर आणि जालना जिल्ह्यांतील काही भागात, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गाळप सुरु राहू शकेल असे त्यांनी सांगितले. इतर राज्यातून 129 हार्वेस्टर आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. त्याद्वारे उसाची तोडणी सुरु आहे. एकट्या जालना जिल्ह्यात सध्या 29 हार्वेस्टर काम करत असल्याची माहिती शेखर गायकवाड यांनी दिली. राज्यात 2020-21 मध्ये 11.42 लाख हेक्‍टरवर उसाची लागवड झाली होती, परंतु यावर्षी (2021-22) हा आकडा 2.25 लाख हेक्‍टरने वाढून 13.67 लाख हेक्टर झाला आहे. गतवर्षी 1 हजार 13.31 लाख टन उसाचे गाळप झाले होते.

यावर्षी (16 मे पर्यंत) 1 हजार 300.62 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. आत्तापर्यंत गाळपात 287.31 लाख टनांची वाढ झाली आहे. राज्यात 30 हून अधिक साखर कारखाने सुरु राहू शकतात. 15 मेपर्यंत राज्यातील एकूण 199 साखर कारखान्यांपैकी 126 कारखान्यांनी या हंगामासाठी त्यांचे कामकाज बंद केले आहे. 25 मे पर्यंत हा आकडा 163 पर्यंत जाऊ शकतो. उर्वरीत 36 साखर कारखाने उसाचा साठा संपेपर्यंत काम सुरु ठेवू शकतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात 2020-21 मध्ये 11.42 लाख हेक्‍टरवर उसाची लागवड झाली होती, परंतु यावर्षी (2021-22) हा आकडा 2.25 लाख हेक्‍टरने वाढून 13.67 लाख हेक्टर झाला आहे. गतवर्षी 1 हजार 13.31 लाख टन उसाचे गाळप झाले होते. तर यावर्षी (16 मे पर्यंत) 1 हजार 300.62 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. आत्तापर्यंत गाळपात 287.31 लाख टनांची वाढ झाली आहे. राज्यात 30 हून अधिक साखर कारखाने सुरु राहू शकतात. 15 मेपर्यंत राज्यातील एकूण 199 साखर कारखान्यांपैकी 126 कारखान्यांनी या हंगामासाठी त्यांचे कामकाज बंद केले आहे. 25 मे पर्यंत हा आकडा 163 पर्यंत जाऊ शकतो. उर्वरीत 36 साखर कारखाने उसाचा साठा संपेपर्यंत काम सुरु ठेवू शकतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

 

You Might Also Like

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता

मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर

छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा

दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी

अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे

TAGGED: #Farmers #worried #Maharashtra #17.5lakh #tonnes #sugarcane #left, #शेतकरी #चिंता #वाढली #महाराष्ट्र #17.5लाखटन #ऊस #शिल्लक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आमचे नेते कोणत्याही जातीबद्दल अनुचित बोलणार नाहीत – शरद पवार
Next Article “माझ्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली “

Latest News

थोरात कारखान्याच्या मदतीने हायटेक बसस्थानकाची स्वच्छता
महाराष्ट्र May 8, 2025
मालेगाव स्फोट प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर
महाराष्ट्र May 8, 2025
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट
देश - विदेश May 8, 2025
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय
देश - विदेश May 8, 2025
ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
देश - विदेश May 8, 2025
छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
महाराष्ट्र May 8, 2025
दोन दिवसांपूर्वी झाला विवाह अन् फौजी निघाला देशसेवेसाठी
महाराष्ट्र May 8, 2025
अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी – आदिती तटकरे
महाराष्ट्र May 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?