Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: died of heatstroke महाराष्ट्रात 11 दिवसांत उष्माघाताने 6 जणांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

died of heatstroke महाराष्ट्रात 11 दिवसांत उष्माघाताने 6 जणांचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2022/05/23 at 4:22 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई : राज्यात अनेक शहरात सूर्य तळपला आहे. काही शहरात 45 ते 46 अंशांपर्यंत तापमान गेले. 11 ते 21 मेदरम्यान मात्र राज्यात सहा जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा फारच तापला. In Maharashtra, 6 people died of heatstroke in 11 days

बहुतांश शहरात 40 च्या वर तर काही भागात 45 ते 46 अंशांपर्यंत तापमान गेले. पण उन्हासोबत वाऱ्याचा वेग अपेक्षित वाढलेला नसल्याने 10 मेपर्यंत राज्यात उष्माघाताने बळीची एकही अधिकृत नोंद नव्हती. मात्र त्यानंतर 11 ते 21 मेदरम्यान मात्र राज्यात सहा उष्माघाताने मृत्यूची नोंद झाली. 10 मे 2022 पर्यंत राज्यात 25 उष्माघात संशयितांचा मृत्यू झाला होता.

त्यात जळगाव 4, नागपूर 11, जालना 2, अकोला 3, अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद, परभणीमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे. या 25 पैकी 6 मृत्यू हे उष्माघाताचे बळी असल्याचे आरोग्य विभागाने सांगितलं. जालना, उस्मानाबाद, अकोला, जळगावचे प्रत्येकी 1 तर नागपूरच्या 2 जणांचा त्यात समावेश आहे.

राज्यात काही भागात अवकाळी पाऊस होत असला तरी उष्णतेचे प्रमाण मात्र वाढत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्यात उष्णतेची दाहकता जाणवते. उष्णता वाढल्याने उष्माघाताने होणारे मृत्यूही वाढले आहेत.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/546124343731966/

राज्यात उष्णता वाढल्याने १० मेपर्यंत ५४३ मग आताचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये विविध जिल्ह्यातील २९ संशयितांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. पैकी ५ जळगाव, १२ नागपूर, ३ जालना, ३ अकोला, २ अमरावती, १ औरंगाबाद, १ हिंगोली, १ उस्मानाबाद, १ परभणी जिल्ह्यात मृत्यू झाले आहेत. सहा जणांच्या मृत्यूचा अहवाल आला असून ते उष्माघाताचे बळी ठरले आहेत. उर्वरित मृत्यू उष्माघात संशयित आहेत. त्यांच्या मृत्यूचा अहवाल आल्यानंतर त्याबाबत स्पष्टीकरण दिले जाईल, असे राज्याच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

डिहायड्रेशन आणि मधुमेह एकत्र दिसून येतात. मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशनचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. शरीरामध्ये पुरेसे इन्सुलिन तयार होत नसल्यामुळे रक्तात साखर तयार होते. आणि या साखरेला शोषून घेण्यासाठी तुमचे मूत्रपिंड जास्त काम करत असतील तेव्हा मधुमेह होतो. जर तुमची मुत्रपिंड अधिक प्रमाणात काम करत असतील तर शरीर रक्तातील अतिरिक्त साखर मूत्र विसर्जनाद्वारे घालवते ज्याकरिता तुमच्या टिश्यूकडून द्रव घेतले जाते.

खरंतर डिहायड्रेशन हा सर्वांच्याच काळजीचा मुद्दा आहे. परंतु, मधुमेह असणाऱ्यांनी मात्र याकडे नक्कीच गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. मधुमेह आणि डिहायड्रेशन त्यांच्या एकत्रीकरणामुळे आरोग्याच्या बाबतीत अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यासाठी काही साधे उपाय करून पाहिल्यास नक्कीच यावर नियंत्रण ठेवता येते.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/546370867040647/

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Maharashtra #6people #died #heatstroke #days #nagpur #amravati, #महाराष्ट्र #11दिवसांत #उष्माघात #6जण #मृत्यू #अमरावती #हिंगोली
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Congress solapur गटनेत्याला खूष केले, निष्ठावंताला डावलले; चेतन नरोटे यांनी प्रभाग रचनेमध्ये केली फोडाफोडी
Next Article पंतप्रधान 14 जूनला महाराष्ट्र दौऱ्यावर; तुकोबांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?